वीज मंत्र्यांनी लक्ष घालावे : आमदार सुदिन ढवळीकर यांची मागणी
वार्ताहर / मडकई
मडकई मतदार संघात विजेचा लंपडाव सूरू असल्याने येथील नागरीकांच्या तक्रारी वाढत आहे. त्यासाठी विज मंत्री निलेश काब्राल यांनी या भागाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा. तसेच सरकारने आर्थीक संकटात सापडलेल्या फुलविक्रेते, गाळेधारक व ट्रक्सीचालकांना आर्थीक पॅकेज देण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेतून केली.
बांदोडा येथील त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. गेले काही दिवस पंधरा मिनीटासाठी विद्युत पुरवठा खंडीत होतो. तर परत पूढच्या पंधरा मिनीटासाठी हाच विज पुरवठा सुरळीत होतो. अशा सतत विजेच्या लंपडावाच्या खेळामूळे विद्युतवर चालणारी उपकरणे निकामी होत असल्याने नागरिकांनी तक्रारींचा सपाटा लावलेला आहे. विद्यूत खात्याच्या अभियंत्याशी या समस्येविषयी चौकशी केली असता. त्यांना विजकामाकरीता लागणारे साहीत्य खात्याकडून वेळेवर मिळत नाही. तसेच अपूऱया कर्मचाऱयासाठी या समस्या त्वरीत सोडवीता येत नसल्याची कारणे त्यांच्याकडून मिळत आहे. या सबबीतून सरकारची आर्थीक परिस्थीती ढासळय़ाचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्या सोडविण्यासाठी विजमंत्र्यांनी या भागाची पाहणी करणे आवश्यक असल्याचे मत आमदार श्री ढवळीकर यांनी व्यक्त केले.
कोरानाच्या वाढत्या संसर्गामूळे गेव्यातील धार्मिक स्थळे बंद असल्याने फुलविक्रेत्यांना, फळवाल्यांना व पर्यटक ट्रक्सीवाल्यांना सरकारने आर्थीक पॅकेज देण्याची मागणी आमदार सुदिन ढवळीकर यांनी करताना त्यांची व्यथा या परिषदेतून कथन केली. गोव्यातील छोटय़ा मोठया देवस्थानच्या बाजूला बसून फुलांची विक्री करून स्वतःच्या कुटूंबाची गुजराण करण्याऱया गरिब फुलविक्रेत्यांवर आर्थीक संकट कोसळलेले आहे. त्याला जोडून असलेल्या गाळय़ा धारकांचीही परिस्थीती काही वेगळी नाही. पर्यटकांना घेऊन बिचचे व या धार्मिक स्थळांचे दर्शन घडवणारे ट्रक्सीचालक यांच्याही व्यवसायावर संक्रमण आल्याने त्यांच्याही आर्थीक परिस्थीतीचा प्रश्न उद्भवलेला आहे. याच व्यवसायावर अवलंबून असलेल्या गरिब व्यावसायीकाना आणखींन वेगळा धंदा नसल्याने त्यांच्या व्यथा सद्सद्विवेक बुध्दीला स्मरून काम करण्याऱयांच्या डोळय़ात आसवे जमा करणारी आहे. सरकारने या तळागाळातल्या सामान्य घटकांसाठी त्वरीत आर्थीक पॅकेज देण्याची मागणी आमदार श्री ढवळीकर यांनी या पत्रकार परिषदेतून केली. यंदाच्या मौसमात पर्यटक नसल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही. पर्यटका नसल्याने पाण्याची पातळी योग्य राहीली व नागरिकांचेही पाण्याविना हाल झाले नाही. पण भविष्यात पाण्याचा प्रश्न सरकारने गाभीर्याने न घेतल्यास परिस्थीती बिकट होण्याची भिती या पत्रकार परिषदेतून आमदार श्री ढवळीकर यांनी व्यक्त केली.