ऑनलाईन टीम / कोलकत्ता
बंगालच्या विधानसभांकडे देशाचे लक्ष लागुन होते. याला निमित्त असते कधी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांवर केलेल्या राजकिय चाली. तर कधी भाजपमधील नेते तृणमुलचा झेंडा अनपेक्षितरित्या घेत पुन्हा घरवापसी करतात. याच पार्श्वभुमीवर बंगाली अभिनेत्री श्रबंती चॅटर्जीने गुरुवारी भारतीय जनता पार्टी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापुर्वी ही अनेक नेत्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा ( West Bengal election 2021) तोंडावर असताना तृणमुल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये सुवेंदू अधिकारी, दिनेश त्रिवेदी, सोनाली गुहा ,रवींद्रनाथ भट्टाचार्य,जटू लाहिरी माजी फुटबॉलर दिपेन्दू विश्वास यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
तसेच २ मार्च २०२१ रोजी विधानसभा निवडणुकीपूर्वी बंगाली अभिनेत्री श्रबंती चॅटर्जी पक्षात सामील झाल्या होत्या आणि भाजपाने त्यांना उमेदवारी दिली होती. याला काही अवघा चार ते पाच महिन्यांचा कालावधी सरतो न् सरतो तोच चॅटर्जी यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. यावेळी त्यांनी भाजपला नारळ देताना बंगालच्या राजकारणात भाजपामध्ये पुढाकार घेण्याची क्षमता कमी असून प्रामाणिकपणाचा अभाव आहे, असं कारण दिले आहे. तसेच “मी ज्या पक्षाकडून राज्यातील विधानसभा निवडणुका लढवल्या त्या भाजपशी सर्व संबंध तोडून टाकले आहेत. त्याचे मुख्य कारण बंगालच्या राजकारणात भाजपामध्ये पुढाकार घेण्याची क्षमता कमी असून प्रामाणिकपणाचा अभाव आहे,” असे श्रबंती चॅटर्जी यांनी ट्विट करून म्हटले आहे.
‘या’ नेत्यांनी केला तृणमुलला रामराम
सुवेंदू अधिकारी आणि दिनेश त्रिवेदी तसेच टीएमसीचे 5 आमदारांनी एकत्र येऊन पक्षाला निरोप दिला होता. तसेच चार वेळा आमदार आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची अनेक दशकांची निकटच्या सहकारी सोनाली गुहा आणि सिंगूर चळवळीचा प्रमुख चेहरा असलेले रवींद्रनाथ भट्टाचार्य यांना निवडणुकीत तिकीट न दिल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच चार वेळा आमदार राहिलेले जटू लाहिरी आणि पहिल्यांदाच आमदार बनलेले माजी फुटबॉलर दिपेन्दू विश्वास यांनीही पक्ष बदलला होता.तर यानंतर घरवापसी करत थोड्याच कालावधीत आपण भाजपमध्ये थांबु शकत नाही. असे म्हणत पुन्हा तृणमुल काँग्रेसमध्ये पुन्हा घरवापसी केली आहे.