अहिंसावादी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी 30 जानेवारी रोजी आचरणात आणली जाते. त्यांच्या दोनच शब्दात प्रचंड सामर्थ्य होते. त्यांच्या विचार, उच्चार व आचारांविषयी अद्यापही भारतीयांच्या मनात आदर आहे.
देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात महात्मा गांधींनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत स्वातंत्र्याचे एक वातावरण तयार केले. हातात शस्त्र न घेता शांततामय मार्गाने आपल्या स्वातंत्र्याची मागणी करायची आणि सत्ताधाऱयांनी लाठी मारली तर खायची, गोळी मारली तर झेलायची; पण, प्रतिकार न करता आपली मागणी ठामपणे मांडत राहायची. असे एक जगाच्या पाठीवरचे अद्भूत तत्त्वज्ञान महात्मा गांधींनी आपल्या कृतीतून लोकांसमोर ठेवले. त्याचा परिणाम असा झाला की, गांधीजींच्या या अहिंसक तत्त्वज्ञानाने साऱया देशात एक अहिंसक पर्व तयार झाले. आत्मीक आवाजाचे सामर्थ्य किती मोठे आहे आणि ‘सत्य’ शब्दाला किती मोठी प्रति÷ा आहे, याचे दर्शन घडवणारा तो काळ होता. महात्माजींना न पाहिलेले, महात्माजींना न भेटलेले, महात्माजींचे भाषण न ऐकलेले असे या देशातील कोटय़वधी लोक ‘बापू सांगतात म्हणून’ सत्याचे प्रयोग करीत राहिले. अहिंसेचे प्रयोग करीत राहिले आणि स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, लाठी, गोळी खायला, रस्त्यावर उतरायला सिद्ध झाले. हे वातावरण महात्माजींच्या कर्तृत्व, चारित्र्यातून निर्माण झाले. ‘करेंगे या मरेंगे’ या दोन शब्दांमध्ये, क्रांतीचा वणवा पेटवण्याची शक्ती आहे, त्यापेक्षा अधिक शक्ती होती.
गांधीजींच्या नेतृत्वाचा परिणाम स्वातंत्र्यासाठी लढणाऱया तरुणांच्या मनावर इतका जबरदस्त झाला होता, की परदेशी कपडय़ाच्या गाडीपुढे या तरुणाने उडी घेतली. रक्ताच्या चिळकांडय़ा उडाल्या. बाबू गेनू अमर झाला. नंदूरबारचा शिरीषकुमार मेहता. एवढासा कोवळा जीव. पण गांधीजींच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या अहिंसक संदेशाने भारलेल्या त्या बालकाने भारतीय स्वातंत्र्याच्या बलवेदीवर आपल्या जीवाचे फूल समर्पण केले. सगळा देश या भावनेने भारलेला होता. 1930 ते 1947 या 17 वर्षाच्या काळात महात्माजींनी देशाला नवी प्रेरणा दिली, नवी दृष्टी दिली आणि अवघ्या दोन शब्दांमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची फार मोठी शक्तीही दिली. जगात कोणताही देश असा नाही जो फक्त दोन शब्दांनी स्वतंत्र झालेला आहे आणि ते शब्द आहेत, ‘चले जाव’, ‘छोडो भारत’, ‘जय हिंद’, ‘चलो दिल्ली’.. अशा दोन शब्दातून साधने नसताना अख्ख्या देशाला जागे करण्याची आणि गदगदा हलवण्याची ताकद गांधीजींच्या नेतृत्वात होती.
हा गांधीवाद हा केवळ स्वातंत्र्य मिळवण्यापुरता नव्हता. तो जीवन-मरणाची एक शैली आहे. खादीचा वापर, स्वावलंबन, श्रमाची प्रति÷ा, अद्ययावत खेडय़ांची निर्मिती आणि सार्वजनिक जीवनातील चारित्र्य ही गांधीवादाची सूत्री आहे. श्रमाशिवाय मिळवलेला पैसा झूठ आहे, हे सांगण्याचे धाडस फक्त गांधीवादात आहे. श्रमाची पूजा केली पाहिजे, हे सांगण्याचे धाडस गांधीवादात आहे. कोणतेही काम करायला लाज वाटता कामा नये, हेही गांधीवाद सांगतो. एक काळ असा होता जेव्हा स्वातंत्र्य चळवळीत समाजवादी तत्त्वज्ञानाचा प्रभावही लोकांवर पडलेला होता. पंडित नेहरू त्या समाजवादी विचारांनी भारावलेले होते. समाजवादामध्ये गरिबीची वाटणी नसते. श्रीमंतीची असते. गांधीवादामध्ये श्रमाची वाटणी आहे.
या देशातला गांधीवाद हा गेल्या काही दिवसांत पराभूत होताना दिसत आहे. गांधी जीवनाचे एक तत्त्वज्ञान आहे. परदेशातल्या अनेक देशांनी या गांधीवादाच्या तत्त्वज्ञानाने अचंबित होऊन गांधींना विश्वपुरुष मानले. त्या महात्माजींना आपल्या देशातील जनता मात्र फार झपाटय़ाने विसरलेली दिसते. गांधीजींना ज्याने मारले, त्या प्रवृत्तीचा गौरव होताना दिसतो आहे. त्या मारेकऱयाची स्मारके करण्याची चर्चा होते. त्यावर नाटके येतात आणि एका खलनायकाची प्रतिमा नायकामध्ये परावर्तीत करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न होतो.
दुर्दैवाने आजचे सरकार हेसुद्धा गांधीवादी विचारांना संपवण्याच्या मागे आहेत. या सरकारला आणि या प्रवृत्तीला ही गोष्ट स्पष्टपणे सांगायची गरज आहे की, असा प्रयत्न करणारे संपतील; पण गांधीवाद नावाचा विचार कधीही संपू शकणार नाही. गांधींना मारणारे मेले; पण गांधींजी विचारांच्या रूपाने जिवंत आहेत. गांधीजींनी देशाला जो महामंत्र दिलेला आहे, त्यातून या देशाला मिळणारी स्फूर्ती आणि ऊर्जा ही देशाची शाश्वत ऊर्जा आहे.
गांधीवाद हा विचार आहे. असत्याला सत्याने सामोरे जाण्याकरिता एक नैतिक अधि÷ान लागते. ते नैतिक अधि÷ान हा गांधी विचार आहे. या विचाराचे सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे, गांधीवादाचे सामर्थ्य हे त्या बंदुकीच्या गोळीपेक्षा अधिक प्रभावी आहे. त्यामुळे गांधीवाद आणि गांधी विचार हा कधीही हतबल होणार नाही आणि कधीही पराभूत होणार नाही. गांधीवाद कायमचा जिवंत राहणार आहे.