महाबळेश्वर / प्रतिनिधी :
पुणे, कोल्हापूर, सांगलीनंतर आता महाबळेश्वर शहराच्या मुख्य बाजारपेठेत रानगवा शिरल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री 1 वाजता एक वाट चुकलेला रानगवा बाजारपेठेत आला. बसस्थानकापासून बाजारपेठमार्गे तो छ. शिवाजी महाराज चौकातून खिंडीत आला. आणि तेथून तो जंगलात परतला. सुदैवाने कोणतीही दुघर्टना येथे घडली नसली तरी नागरीक आणि पयर्टकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
महाबळेश्वर हे प्रसिध्द थंड हवेचे पयर्टन स्थळ सदाहरीत घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. या जंगलात रानगव्यांची संख्या मोठया प्रमाणावर वाढलेली आहे. हे गवे नेहमी कळपाने संचार करीत असतात. येथील विविध पॉइंर्टवर कायम रानगव्यांचे दशर्न नागरीक व पयर्टकांना होत असते रानगव्यांच्या हल्ल्याच्या घटनाही येथे घडलेल्या आहेत. काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर अनेक जण रानगव्यांच्या हल्ल्यात जखमीही झालेले आहेत. हे रानगवे अनेक वेळा शेतीत शिरून पिकांचे मोठे नुकसान देखिल करतात. हे रानगवे शहरात कधी आले नाहीत परंतु, सोमवारी कळप सोडुन एक रानगवा वाट चुकून शहरातील नागरी वस्तीत आला. मधुसागर या भागात फिरणारा हा रानगवा शहरात घुसला बस स्थानकातून हा गवा सुभाषचंद्र बोस चौकात आला. तेथून तो बाजारपेठेत शिरला. या ठिकाणी काही युवक हे रानगव्याच्या मागे लागले, युवक आरडाओरडा करीत रानगव्याच्या मागे लागताच रानगवा हा पळत सुटला. तो जेव्हा पोलिस ठाण्यासमोर आला तेव्हा पोलिसांनी रानगव्याच्या मागे लागलेल्या युवकांना हटकले. दरम्यान वन विभागाचे दोन कमर्चारी हे तेथे आले. या ठिकाणी काही युवकही होते, युवकांच्या मदतीने वन कमर्चारी यांनी हा रानगवा शहराच्या इतर भागात किंवा नागरी वस्तीत जावु नये, याची खबरदारी घेतली तेव्हा तो रानगवा हा खिंडीत शिरला त्या नंतर तो पुढे जंगलात आपल्या नैसगिर्क अधिवासात परतला.