महामार्ग प्राधिकरणाची बैठक : कोगनोळीत रयत संघटनेतर्फे आनंदोत्सव साजरा, तरीही गाफील न राहण्याचे आवाहन
वार्ताहर /कोगनोळी
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर महामार्ग प्राधिकरण विभागाकडून रस्त्याचे सहापदरीकरण व उड्डाणपूल करून मॉलची स्थापना करण्यात येणार होती. त्यामुळे शेतकऱयांची सुपीक जमीन यामध्ये जाणार होती. या प्रकल्पाला रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱयांनी विरोध दर्शविला होता. रयत संघटना व प्राधिकरण अधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये अधिकाऱयांनी प्रकल्प रद्द करून याठिकाणी फक्त सहापदरीकरण रस्ता करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
रयत संघटनेने प्रकल्पाला केलेल्या विरोधाला यश आल्याने रयत संघटना व शेतकऱयांनी कोगनोळी महामार्गावर मंगळवारी सायंकाळी फटाक्मयांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी बोलताना रयत संघटना चिकोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणचा प्रकल्प बंद होण्यासाठी निवेदन दिले होते. तसेचे आंदोलनही केले होते. शेतकऱयांना विश्वासात घेऊनच राष्ट्रीय महामार्गाचे प्राधिकरण व्हावे, अशी मागणी करत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले होते. होणाऱया नुकसानीविषयीची व्यथा अधिकाऱयांसमोर मांडल्यानंतर अधिकाऱयांनी हा प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
निपाणी तालुका रयत संघटना युवाध्यक्ष बाळासाहेब हादीकर म्हणाले, अधिकाऱयांच्या सांगण्यावरून प्रकल्प रद्द झाला म्हणून शेतकरी वर्गाने गाफील राहू नये. भविष्यातही रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱयांच्या न्याय हक्कासाठी संघटना लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रयत संघटना कोगनोळी अध्यक्ष अनंत पाटील, उपाध्यक्ष मधुकर इंगवले, सेपेटरी राजकुमार पाटील, युवराज माने, उमेश परीट, जावेद मुल्ला, प्रकाश परीट, तौसिफ मुल्ला, पुंडलिक माळी, याकूब मुल्ला, सचिन चौगुले, अब्जल मुल्ला, प्रकाश वडर यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.