ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या आदेशानुसार, महिला पोलिसांना आता 12 ऐवजी 8 तासच डय़ुटी करावी लागणार आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत माहिती दिली.
पांडे म्हणाले, महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय दिलासादायक आहे. कुटुंब आणि नोकरीचा ताळमेळ घालताना महिला पोलिसांना भेडसावणाऱया समस्या पाहता सरकारने त्यांच्या कामाचे 4 तास कमी केले आहेत. त्यामुळे महिला पोलिसांना 12 तासांऐवजी 8 तासच कामावर हजर राहावे लागेल.