प्रतिनिधी/ रत्नागिरी
संपूर्ण देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे माणसांप्रमाणेच प्राण्यांचीही अन्न व पाण्यासाठी वणवण सुरू आहे. रत्नागिरी शहरात मोकाटपणे फिरणाऱया गुरे, कुत्रे यांच्या उपासमारीचे चित्र काही वेगळे नाही. पण एक माणुसकी व आपली काही जबाबदारी समजून एक सामाजिक कार्य करणारे रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाचे कर्मचारी राजू जाधव हे या जनावरांच्या उपासमारीबाबत काळजी घेत आहेत. गेले 10 दिवस काही प्रमाणात गवत, पाव, बटर, बिस्किटे जे काही बाजारात मिळेल ते घेऊन त्यांनी या मुक्या जनावरांची भूक भागविण्याचा प्रयत्न ठेवला आहे.
कोरोनोमुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱया माणसांप्रमाणेच प्राण्यांचाही पोटाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. रत्नागिरी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, दुकाने, हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी टाकल्या जाणाऱया कचऱयावर गुजराण करणाऱया मोकाट गुरे, कुत्रे यांचा मोठय़ा प्रमाणात वावर दिसून येतो. पण शहरात कायमस्वरूपी मुक्कामी असलेल्या या जनावरांना लॉकडाऊनमुळे अन्नही मिळेनासे झालेले आहे. या मोकाट जनावरांच्या पोटाचा प्रश्न गंभीर झाला.
एकीकडे माणसांना सगळीकडेच मोठय़ा प्रमाणात मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या मुक्या प्राण्यांची होणारी अवहेलना लक्षात कुणी घ्यावी असा प्रश्न उभा राहतो. या काळात माणसाच्या जीवनावश्यक गोष्टी पुरविण्यासाठी सर्वच ठिकाणी प्रयन्त केले. परंतु कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून किंवा संस्थेकडून रस्त्यावर फिरणाऱया मुक्या जनावरांच्या होणाऱया उपासमारीकडे गेली महिनाभरात लक्ष कोण देणार हा प्रश्न आहे. पर्यायाने त्यांची उपासमारीची वेळ आली. पण एक माणुसकी व आपली काही जबाबदारी समजून एक सामाजिक कार्य करणारे जिल्हा परिषदेतील कर्मचारी राजू जाधव पुढे सरसावले.
जाधव यांनी शहरात फिरणाऱया या मोकाट गुरांची चारा-पाण्यासाठी होणारी वणवण निदर्शनास आली. त्यांनी या जनावरांना गेली 10 दिवस काही प्रमाणात गवत, पाव, बटर, बिस्किटे जे काही बाजारात मिळेल ते घेऊन त्यांनी या मुक्या जनावरांची भूक भागविण्याचा प्रयत्न केला आहे. खऱया अर्थाने ते माणुसकीचे काम करीत आहे. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या इतर सहकारी कर्मचारी व मित्रांच्या सहकार्याने पिण्याचा पाण्याचा टँकर भाडय़ाने घेतला. येथील बसस्थानक ते गाडीतळ, झाडगाव , काँग्रेस भुवन, आठवडा बाजार, माळनाका याठिकाणी फिरून मोकाट फिरणाऱया मुक्या जनावरांना पाणी पाजून त्यांची तहान भागविली आहे. सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांच्यासोबतच जि. प. कर्मचारी बाबल्या सावंत, मलेरिया कर्मचारी सुधीर सावंत, दीपक कांबळे, पिंटय़ा सावंत यांचीही साथ लाभली आहे.