दिग्गज उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजचे कौतुक केले आहे. आमच्या अस्तित्वाची धारणा सामर्थ्यात बदलण्याची सुवर्ण संधी आमच्यासमोर आहे. जगण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीकोनाला बदलत त्याला सामर्थ्याचे स्वरुप दिले जावे. 1991 प्रमाणे ही संधी मोठा बदल घडवून आणते की नाही हे भविष्यात समजून येईल. परंतु आता आम्हाला स्वस्थ बसता येणार नसल्याचे आनंद महिंद्रा म्हणाले. महिंद्रा समुहाने स्वतःच्या कामकाजाला प्रारंभ केला आहे.
उद्योजक महिंद्रा हे समाजमाध्यमांवर अत्यंत सक्रीय असतात आणि सातत्याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर मत मांडतात. जगभरात होत असलेल्या नव्या प्रयोगांची माहिती देण्यावर त्यांचा भर असतो.