प्रतिनिधी/ सातारा
लॉकडॉऊन सुरु झाल्यापासून राजवाडा बसस्थानकात एकही बस फिरकली नव्हती. राजवाडा बसस्थानकात शुकशुकाट निर्माण झाला होता. परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हळूहळू मोठय़ा गावांना बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजवाडा बसस्थानकात शनिवारी सकाळी लालपरी उभी होती. मात्र, एकटीच लालपरी भाजी विक्रीच्या गाडय़ात उभी असल्याचे दिसून येत होते. अगदी खुलून लाल परी दिसत होती.