सावंतवाडी/प्रतिनिधी –
आता एसटी महामंडळाचे संपावर असलेले कर्मचारी कामावर परतू लागले आहेत गेल्या चार दिवसात 21 कर्मचारीकामावर रुजू झाले आहेत गेले पाच महिने एस टी महामंडळाचे कर्मचारी संपावर आपल्या मागण्यांसाठी संपावर होते. एसटीच्या विलीनीकरणाचसह सातवा वेतन तसेच पगारवाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप होता शासनाने काही मागण्या पूर्ण केल्या.कर्मचाऱ्यांना पगार वाढ दिली.त्यानंतर संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते परंतु विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहुन कर्मचारी संपावर होते.तर अजय कुमार गुजर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने संपातूनमाघार घेतल्यानंतर काही कर्मचारी न्यायालयाच्या निर्णयावर भरोसा ठेवून संपावर ठाम राहिले. हे कर्मचारी रुजू झाले त्यात अल्प होते.सावंतवाडी आगारात 301 पैकी हे 40 कर्मचारी कामावरून झाले होते, या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने एसटीच्या काही बस फेऱ्या सुरू झाल्या होत्या, परंतु बहुसंख्य कर्मचारी संपावर राहिल्याने एसटीचा गाडा सुरळीतपणे सुरू झाला नव्हता. अर्थसंकल्प अधिवेशनात एसटीचे विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले होते तरी कर्मचारी न्यायालयाचा निर्णय काय लागताे याकडे लक्ष ठेवून संपावर होते अलीकडे न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले.संपावर असलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई न करण्याच्या सूचना केल्या होत्या.. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. त्यामुळे राज्यात पुन्हा वातावरण ढवळून निघाले. कर्मचारी आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष असतानाच कर्मचारी आता कामावर परतू लागले आहेत.सावंतवाडी आगारात चार दिवसात 21 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.अद्याप 234 कर्मचारी कामावर आलेले नाही.ते 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर होतील अशी अपेक्षा प्रशासनाला आहे पूर्वी. 46 कर्मचारी कामावर हजर झाले होते. आगारातील सव्वीस कल्पना चार यांना बडतर्फ करण्यात आले होते .त्यांना डी सी कडे अपील करून कामावर हजर व्हावे लागणार आहे. तीचबाब 3३ बडतर्फ कामगारांना लागू आहे आता कर्मचारी 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर झाल्यानंतर मे पासून एसटीची सेवा प्रवाशांसाठी सुरळीत होईल अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.