ग्रामीण भागातील महिलांनी सर्व क्षेत्रात पुढाकार घेण्याची आवश्यकता : मुलींनाही उच्च शिक्षण देण्याची गरज
वार्ताहर / किणये
वाघवडे गावात महिलांचा स्नेहमेळावा व ग्राम पंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम बुधवार दि. 20 रोजी मोठय़ा उत्साहात झाला.
गावातील प्राथमिक मराठी शाळेजवळ भव्य असा शामियाना उभारण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी उद्योजक पंडित पाटील होते. प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. मधुरा गुरव (मोटराचे) या होत्या.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. ग्राम पंचायतीच्या नूतन सदस्य भावकाण्णा पाटील, रघुनाथ नाईक, शुभांगी देसाई, वैशाली कांबळे, गंगव्वा नाईक, पल्लवी नाईक या सहा जणांचा शाल, श्रीफळ व मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील महिलांनी आता सर्व क्षेत्रात पुढाकार घेतला पाहिजे. आधुनिक युगाचा विचार करून प्रत्येक गावागावांमधील मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मनोगत डॉ. मधुरा गुरव (मोटराचे) यांनी व्यक्त यावेळी केले.
तसेच घरातील आई-वडिलांची सेवा करा, मुला-बाळांवर चांगले सुसंस्कार घडवा असे गुरव यांनी सांगितले. गावचा व वॉर्डाचा विकास करण्यासाठी तसेच सर्व सामान्य जनतेला विविध प्रकारच्या योजना पुरविण्यासाठी आम्ही नूतन सदस्य कार्य करणार असल्याचे भावकाण्णा पाटील यांनी
सांगितले. कार्यक्रमाला कल्लाप्पा गुरव, के. के. बेळगावकर, पुंडलिक पावशे, मनोहर कलमणकर, सुनील पाटील, के. के. कोवाडकर, बाळू बेळगावकर, बसवंत कदम, गणपती आंबोळकर, सोमनाथ परीट, सुनील विठ्ठल पाटील, परशराम पाटील, अनिल यळगुकर, दयानंद देसाई, पुंडलिक आंबोळकर, रवळू काकतकर संतोष जो. आंबोळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका काकडे, सोमनाथ मल्लाप्पा पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक विनायक पाटील व विवेक सुतार यांनी केले. मनोहर सावंत यांनी आभार मानले.