ग्राहक उपलब्ध होत नसल्यामुळे विपेत्यांना फटका
वाळपई / प्रतिनिधी
वाळपई नगर पालिकेच्या आदेशानुसार शहरातील आठवडी बाजार सुरू करण्यात आला असलातरी गेल्या दोन आठवडय़ापासून बाजाराला संमिश्र स्वरूपाचा प्रतिसाद लाभत आहे.
यामुळे विपेत्यांना तोटा सहन करावा लागत असून ग्राहकच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होताना दिसत आहे. यामुळे वाळपई नगरपालिकेला उलटअर्थी दर बाजाराला सोपो कर भरावा लागतो. यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी विपेत्यांनी केलेले आहे.
याबाबतची माहिती अशी की कोरोना रोगाचा विषाणू झपाटय़ाने फैलावताना असल्यामुळे राष्ट्रीय व राज्य पातळीवर संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे वाळपई शहराच्या मंगळवारी भरणारा आठवडे बाजार नगरपालिकेच्या आदेशानुसार बंद करण्यात आला होता.
जवळपास दीड महिना सदर बाजार बंद होता. सत्तरी तालुक्मयासाठी वाळपई ही प्रमुख स्वरुपाची बाजारपेठ असल्यामुळे दर आठवडय़ाला ग्रामीण भागातील नागरिक मोठय़ा प्रमाणात आठवडय़ाचा बाजार खरेदी करण्यासाठी याआठवडी बाजाराला भेट देत असतात. दोन महिने आठवडी बाजार बंद असल्यामुळे खरेदी व विपेते यांच्यामधील संबंध तुटला होता. गेल्या दोन आठवडय़ापासून शहराच्या आठवडी बाजाराला प्रारंभ झालेला आहे .मात्र दोन्ही सप्ताहामध्ये आवश्यक स्वरूपात ग्राहक उपलब्ध नसल्यामुळे त्याचा बाजारपेठेवर परिणाम झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. शहराचा आठवडी बाजार आजही साजरा करण्यात आला. मात्र अवघे विपेते या बाजारासाठी उपलब्ध असल्याचे पहावयास मिळाले .खासकरून भाजीविपेते फळविपेते व्यतिरिक्त इतर स्वरूपाचे विपेते बाजारामध्ये दिसले नाही.
तुलनात्मकदृष्टय़ा ग्राहकांची संख्या बऱयाच प्रमाणात कमी असल्यामुळे याचा आर्थिक फटका विपेत्यांना बसल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले. सामाजिक अंतर राखून वेगवेगळय़ा ठिकाणी विपेत्यांना नगरपालिकेने बसविले होते. ग्राहकच उपलब्ध नसल्यामुळे आजचा दिवस पूर्णपणे नुकसानीत गेला अशा प्रतिक्रिया विपेत्यांनी व्यक्त केलेले आहे. याबाबत अब्दुल या विपेत्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दोन आठवडय़ापासून मोठय़ा प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. वाळपई शहराच्या आठवडी बाजारासाठी रिक्षा व इतर स्वरूपाचे वाहन करून बाजार आणावा लागतो. मात्र आवश्यक स्वरूपाचे ग्राहक उपलब्ध होत नसल्यामुळे धंदा होत नाही. यामुळे आर्थिक स्वरूपाचा तोटा सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट केलेले आहे. अशाच अवस्थेत वाळपई नगरपालिकेला कर भरावा लागतो. ग्राहक उपलब्ध नसल्यामुळे कर कसा भरावा अशाप्रकारचा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे.
वाळपई शहराचा आठवडी बाजार खासकरून फातिमा कॉन्व्हेंì याशाळे समोरुन गेलेले रस्त्यावर भर असतो. आज आठवडी बाजार असतानासुद्धा रस्ता पूर्णपणे मोकळा श्वास घेताना पहावयास मिळाले. एरवी बाजाराच्या दिवशी हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करावा लागत होता. संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा बाजूने विपेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येत होती. यामुळे प्रमुख रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करावा लागत होता .आजची परिस्थिती मात्र वेगळय़ा प्रकारची होती. बाजार असताना सुद्धा वाहतूक पूर्णपणे या रस्त्यावर होताना दिसत होते.