पंढरपूर / प्रतिनिधी
वाखरी ते पंढरपूर पर्यंत पायी जाण्याचा आग्रह करणाऱ्या मानाच्या पालख्यां समवेतचच्या वारकर्यांची प्रशासनाची बैठक झाली. या बैठकी अंती विसावा मंदिरापासून पुढे 30 वारकऱ्यांना पायी चालत जाण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
वाखरीच्या पालखीतळावर रात्री साडेआठ वाजल्यापासून प्रशासनाची वारकऱ्यांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा सुरू होती. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सर्व मानाचा संतांच्या पालख्यांचे प्रतिनिधींसमवेत चर्चा केली. यामध्ये विसावा मंदिरापर्यंत एसटी बसने प्रवास. तेथून पुढे पंढरपूर पर्यंत एक-दोन नव्हे तर तीस वारकऱ्यांना सह प्रत्येक संतांच्या पादुका पायी जाणार आहेत. त्यामुळे पुढील काही मिनिटांमध्ये पालखी सोहळे वाखरी येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होतील.