भंगार गोळा करणाऱया संघटनेची मागणी : कारवाईकडे पोलीस, पालिकेचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ गोडोली
दुरुस्ती करण्याची ऐपत नसल्यांच्या रस्त्यावर बंद अवस्थेत असलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्या नगरपालिका की पोलिसांनी पैकी कोणी उचलायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गाडय़ा रस्त्याच्या बाजूला विनाकारण लावल्या असून त्या ज्याच्या त्याने घेऊन जाण्यास पोलिसांनी मुदत द्यावी नाही तर भंगार म्हणून घेऊन जाण्यास आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी भंगार गोळा करणाऱया संघटनेच्या सदस्यांनी केली आहे.
आधीच सातारा शहरातील रस्ते अरुंद त्यात खड्डे आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. उठसूट सेकंड मध्ये जुनी चार चाकी गाडी स्वतः घेऊन फिरणाऱयांची संख्या वाढत आहे. कशीतरी पैशाची जुळणी करून घेतलेली जुनी गाडी बंद पडली की पाचावधारण बसते. एक, दोनदा दुरुस्ती केलेले पेमेंट दिले नाही तर मिस्त्राr लोक आधी पहिले पेमेंट मगच आता दुरुस्ती करणार असा सज्जड दम देत दारात उभे करत नाहीत. मग रात्रीच्या अंधारात ढकलत ढकलत नजरेच्या टप्प्यात राहिल अशा ठिकाणी ती गाडी पार्क केली जाते.
आधीच दुरुस्तीची ऐपत नसते त्यात जुन्या मॉडेलच्या गाडीचे स्पेअर मिळत नसल्याने अशी अनेक चारचाकी वाहनेरस्त्याच्या बाजूला धुळखात वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. तरीही कोणी कारवाई करत नसल्याने अनेक गाडय़ा गल्ली बोळात आणि मुख्य रस्त्यावर दिसतात. रस्त्याच्या बाजुला नो पार्किंगमध्ये दिसली गाडी की वाहतूक पोलीस क्षणार्धात जॅमर लावून दंडात्मक कारवाई करतात. वर्षानुवर्षे धुळखात रस्त्यालगत उभ्या असलेल्या गाडय़ावर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
नगरपालिकेची हद्द वाढ झाली असून हद्दीत मोठय़ा प्रमाणावर भंगार योग्य वाहने सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यालगत उभी आहेत. ती संबंधितांना व्यवस्था करण्यास ठरावीक मुदत द्यावी. व्यवस्था न होणारी वाहने भंगार म्हणून उचलण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी भंगार गोळा करणाऱया संघटनेचे सदस्य करु लागले आहेत. आता पोलीस दलाच्या वाहतूक शाखा व पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या भंगार व्यावसायिकांना रीतसर परवानगी अशा धुळखात पडलेल्या गाडय़ा उचलून देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.