प्रतिनिधी /मडगाव
गोव्याचे युगपुरूष भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्याच्या कानाकोपऱयात शाळा सुरू केल्या, हायस्कूल-कॉलेजी सुरू केल्या, त्यामुळेच गोव्यातील ग्रामीण भागातील गोरगरीबांची मुले शिकली-सवरली, मोठय़ा पदावर पोचली. पण, आज केंद्रातील राजकीय पक्ष जे गोव्यात राज्य करत आहे ते भाऊसाहेब बांदोडकरच्या स्वप्नांना ठेच पोचवत असल्याचे टीका मगोचे नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल मडगावात बोलताना केली.
आज सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धत राबविली आहे. पण, गोव्याच्या विविध भागात नेटवर्कची गंभीर समस्या आहे. त्याचा फटका गोव्यातील ग्रामीण भागातील मुलांना बसतोय. मुलांना अभ्यासापासून वंचित रहावे लागते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत गोव्यातील नेटवर्क सुविधा सुधारण्याचे आश्वासन आपल्याला दिले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता करणे त्यांना शक्य झालेले नाही. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू केल्याने असंख्य विद्यार्थी व त्याचे पालक अडचणीत आलेले आहेत. ग्रामीण भागातील मुले शिकू, पुढे जाऊ नये असाच भाजप सरकारचा प्रयत्न आहे व त्यामुळेच भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्वप्नांना ठेच पोचत असल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले.
ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेतले जात असल्याने विद्यार्थ्यांचे व पालकांचे होणारे नुकसान तसेच त्यासाठी आवश्यक सुविधा उलपब्ध कराव्यात या मागणीसाठी काल मगो पक्षातर्फे दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी श्री. ढवळीकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी मगोच्या केंद्रीय समितीचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
गोव्यात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी साधन सुविधा आहे का ?, ग्रामीण भागात नेटवर्क आहे का ?, ऑनलाईन शिक्षण देणाऱया शिक्षकांना तसे प्रशिक्षण दिलेले आहे का ? गरीब मुलांना स्मार्टफोन घेण्यासाठी सरकारने मदत केली आहे या प्रश्नाची उत्तरे सरकारने जनतेला द्यावी असे सुदिन ढवळीकर यावेळी बोलताना म्हणाले.
सरकारकडून जो पर्यंत या प्ऱश्नाची उत्तरे मिळत नाही तो पर्यंत मगो पक्ष हे आंदोलन चालू ठेवणार आहे. या आंदोलनात पालकांनी तसेच शिक्षकांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन श्री. ढवळीकर यांनी केले. मगो पक्ष या आंदोलनाचा भाग म्हणून सर्व तालुक्यातील उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारने जर 15 दिवसांच्या आत मगो पक्षाला तसेच गोव्याच्या जनतेला उत्तर दिले नाही तर विधानसभेच्या तीन दिवस अगोदर पणजीत आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले.
निवडणुकीत स्थानिक पक्षांकडेच युती करू आगामी विधानसभेत युती करायची झाल्यास ती स्थानिक पक्षांकडे करणार असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. दिल्लीतील राष्ट्रीय पक्षांकडे युती करणार नाही. कारण, या पक्षांना गोव्याबद्दल काहीच पडून गेलेले नाही असे ते म्हणाले.