चिपळुणातील मियावाकी जंगल प्रकल्प शुभारंभ प्रसंगी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन
चिपळूण/प्रतिनिधी
मियवाकी हे जपानी तंत्रज्ञान असले तरी झाडांची गर्दी होणे हे सद्यस्थितीत महत्वाचे आहे. झाडाविषयीच्या संवेदना समाजमनात वाढत चालल्या आहेत. ही आनंदाची बाब आहे . महाराष्ट्रात सातत्याने येत असलेली नैसर्गिक आपती काही गभीर इशारा देत आहेत . त्यामुळे आता या सगळ्यातून सजग होणं आणि पुढच्या पिढीसाठी काहीतरी करुन जाणं, हे महत्वाचे वाटत असल्याचे प्रतिपादन नाम फाउंटेशनचे संस्थापक व प्रसिद्ध सिनेअभिनेते मकरद अनासपुरे यांनी काढले.
ग्लोबल चिपळूण टूरिझम संस्थेच्या माध्यमातून धामणवनेे येथील डोंगरात मियावाकी फॉरेस्ट है तंत्र वापरून करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीच्या शुभारंभ बुधवारी सिनेअभिनेते अनासपुरे यांच्याहस्ते आणि आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की , आपल्याकडे अलिकडे झगडाबाबतची संवेदना समाजमनात बाढत चालली आहे आणि ती महत्वाची आहे . मियाचाकीसारखा प्रकल्प है जरी जपानी तंत्रज्ञान असले तरी झाडांची गर्दी होणे ही महत्वाची गोष्ट आहे. आजला महाराष्ट्रात पश्चिम घाटाचे संवर्धन ही काळाची गरज आहे. पुढच्या पिढ्यासाठी ते आवश्यक आहे . कारण महाराष्ट्रात जे काही हिरवंगार जंगल शिल्लक आहे त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. कारण महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती आपल्याला आता सातत्याने सांगत आहेत. काही गंभीर इशारा देत आहेत . आपल्याकडे आता चक्रीवादळ येऊन गेले. यापूर्वी फयान सारख वादळ झाले होते. यासगळ्यातून आता सजग होणं आणि पुढच्या पिढीसाठी काहीतरी करून जाण हे महत्त्वाचं वाटत आहे चार वर्षांच्या कमिटमेंटनंतर येथे आज आलो आहे. कारण झाडांची संख्या वाटत आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रातील बरीच संवेदनशील मंडळी पुढे येत आहेत ही आनंदाची बाब आहे.
प्रत्येकाने आपण कुठल्याही क्षेत्रात मग राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात असू झाडांची सर्वांनाच गरज आहे. कारण आक्सीजन का सर्वांनाच लागतो आणि अलिकडे ऑक्सिजनचे महत्व सर्वानाच कोरोनामुळे पटलेल आहे . व्हेटिलेटर उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णाचे हालही आपण पाहीलेले आहेत . त्यामुळे याची संवेदना सर्वांच्या मनात येऊन काम करण्याची गरज आहे . २०१६ मध्ये शाळेतल्या मुलांना घेऊन ग्लोबल संस्था आणि नाम फाऊडेशनला घेऊन ६५० झाडे लावून तो आज वाढवण्यात आली आहेत . मुळात झाडे लावण्यापेक्षा ती जगवणं आणि वाढवणं हे महत्वाची गोष्ट आहे . झाडांची संख्या आणि त्याचे संगोपन होणे ही कोकणची गरज आहे . हा एकमेव हिरवागार असलेला टापू दिसत आहे आणि त्याचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले . यावेळी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य भाऊ काटदरे , प्रा . प्रकाश राजेशिर्के, ग्लोबल संस्थेचे अध्यक्ष राम रेडीज सचिव संजीव अणेराव , समीर जानवलकर , निलेश बापट , रमण डांगे , मनोज गांधी, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर, संस्था व्यवस्थापक विश्वास पाटील यांच्यासह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते .