50 जण लाभाच्या प्रतिक्षेत
प्रतिनिधी/ सातारा
खासदार उदयनराजे यांनी शहरातील झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काचे घर देण्याकरता सुमारे आठ वर्षापूर्वी युआयडीएसएमटी योजनेतून शहरात घरकुल योजना आणली. घरकुलाची उभारणी झाली. हक्काचे घर मिळावे याकरता लाभार्थ्यांनी 30 हजार रुपये भरले आहेत. मात्र, अद्यापही लाभार्थींना आपले घर मिळाले नाही. लकी ड्रॉ कधी पालिकेच्यावतीने काढण्यात येणार याकडेच 50 जण प्रतिक्षेत आहेत. स्थानिक नगरसेवकांकडे सातत्याने नागरिकांचा पाठपुरावा सुरु असून नगरसेवक विशाल जाधव यांनी याबाबतचे पत्रच मुख्याधिकाऱयांना देताच पालिकेच्या हालचाली वाढल्या आहेत.
सातारा शहरात असलेल्या सर्वच झोपडपट्टीतील कुटुंबांना त्यांच्या हक्काचे चांगले घर त्यांना मिळावे या उद्दात्त हेतूने खासदार उदयनराजेंनी त्या काळी युआयडीएसएमटी योजनेतून घरकुल मंजूर करुन आणली. शनिवार पेठ, मंगळवार पेठेतले घरकुल पूर्ण होव्tन तेथील लाभार्थींना हवाललीही करण्यात आले. परंतु शहरातील काही ठिकाणचे घरकुल बांधून पूर्ण होवूनही त्यांचा ताबा लाभार्थ्याना दिलेला नाही. सदरबजार येथील घरकुलाच्या लाभची तीच अवस्था आहे. त्याबाबत लाभार्थ्यांकडून घरकुलाची सोडत कधी निघेल याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी याबाबत नगरसेवक विशाल जाधव यांच्याकडे तक्रारी केल्या असून नगरसेवकांनी याबाबतची तक्रार थेट मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यडकडे केली असून त्या अनुंषंगाने पालिकेत हालचाली वाढल्या आहेत. मुख्य अभियंता दिलीप चिद्रे यांना याबाबत विचारणा केली असता 32 जणांना घरकुल वाटपाचे राहिलेले आहे. त्यांची यादी काढण्यात येवून येत्या काही दिवसात सोडत काढण्या येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
लवकरात लवकर उरलेल्या घरकुलांची सोडत काढण्यात यावी
घरकुलात रहायला मिळावे म्हणून कर्ज काढून, हात उसने घेवून काही लाभार्थींनी पालिकेकडे 30 हजार रुपये दिले आहेत. त्यांना अजून घर मिळाले नाही. घर तयार असून त्यांच्या ताब्यात दिले जात नसेल तर हा अन्याय आहे. लवकरात लवकर पालिकेने उरलेल्या घरांची सोडत काढावी.