कृषी बिलाचीही सक्ती नको – हरी खोबरेकर यांची मागणी
वार्ताहर / मालवण:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे सर्व व्यवसाय ठप्प आहेत. यात महावितरणने सरासरी वीजबिल देण्याचा निर्णय घेतला असून याचा फटका व्यावसायिक, उद्योजकांना बसणार असल्याने सरासरी वीज बिलाची आकारणी करू नये. कृषी वीजबिलाचीही सक्ती नको, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी महावितरणच्या अधिकाऱयांकडे बुधवारी केली. याप्रकरणी वरिष्टांचे लक्ष वेधले जाईल, असे महावितरणचे अभियंता गणेश साखरे यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या काळात महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱयांना घरोघरी जाऊन वीजबिलांसाठी रिडिंग घेणे धोक्मयाचे असल्याने सरासरी वीजबिल देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, संदेश तळगावकर, श्याम झाड यांच्यासह अन्य पदाधिकाऱयांनी महावितरणचे अभियंता गणेश साखरे यांची देऊळवाडा येथील कार्यालयात भेट घेतली. सरासरी वीजबिलाची आकारणी ही वर्षभराच्या वीजबिलाच्या आकारणीवरून सरासरी काढण्यात येणार आहे. ज्यावेळी वीजबिलांचे रिडिंग घेतले जाईल. त्यावेळी आकारणी केलेल्या वीजबिलातून सूट दिली जाईल. आज अनेक ग्राहकांकडे चांगले मोबाईल असल्याने त्यांनी महावितरणचे अँप डाऊनलोड करून त्यावर रिडिंग अपलोड केल्यास त्यानुसार वीजबिलाची आकारणी केली जाईल. हे अँप वापरण्यास सोपे असल्याने जास्तीत जास्त ग्राहकांनी या अँपचा वापर करावा, असे आवाहन साखरे यांनी केले.