केंद्र सरकारचा निर्णय : पुढील तीन महिन्यात अधिकाधिक उचल शक्य : कारखानदारांना दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
साखर कारखानदारांना आपल्या कोटय़ातील अनिवार्य साखर निर्यात करण्यासाठी आणखी तीन महिने म्हणजे डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून मिळाली आहे. अन्न मंत्रालयाच्या वरि÷ अधिकाऱयाने सोमवारी यासंबंधीची माहिती दिली. अतिरिक्त साखरेच्या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने सप्टेंबरमध्ये संपलेल्या विपणन वर्ष 2019-20 साठी कोटय़ातून 60 लाख टन निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. भारतातील वेगवेगळय़ा कारखान्यांमधील साखर इराण, इंडोनेशिया, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि इतर देशांमध्ये निर्यात केली जाते.
साखर निर्यातीच्या धोरणानुसार 60 लाख टनांपैकी जवळपास 57 लाख टनांची ऑर्डर स्विकारण्यात आली होती. कारखान्यांमधून आतापर्यंत सुमारे 56 लाख टन साखर बाहेर पडलेली आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊनमुळे काही कारखान्यांना साखर निर्यात करण्यात अडचणी आल्या. लॉकडाऊन नियमावलीनुसार वाहनांच्या रहदारीवर आणि राज्यांच्या सीमा पार करण्यावरही निर्बंध असल्यामुळे बऱयाच कारखान्यांच्या गोदामांमध्ये अजूनही साठा शिल्लक आहे. तसेच निर्यातीचा निर्धारित आकडाही अद्याप गाठला गेला नसल्याने केंद्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ जारी केल्याचे अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुबोध कुमार सिंह यांनी सोमवारी स्पष्ट केले.
तांत्रिक समस्येमुळे मुदतवाढीचा निर्णय
कोरोना संसर्गाच्या काळात अनेक कारखान्यांमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे आता कारखान्यांना त्यांचा कोटा निर्यात करण्यास परवानगी देण्यासाठी डिसेंबरपर्यंत अतिरिक्त कालावधी देण्याचे आम्ही ठरविले आहे, असे सिंह म्हणाले. आतापर्यंत भारतीय कारखान्यांनी इराण, इंडोनेशिया, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि अन्य देशांमध्ये साखर निर्यात केली आहे. इंडोनेशियाने गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केल्याने निर्यातीत समस्या निर्माण झाली होती. मात्र, त्यासंबंधीच्या सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या असून आता भारतातील साखरेसाठी इंडोनेशियाही सकारात्मक असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले.
निर्यातीसाठी 6,268 कोटी रुपयांचे अनुदान
जादा साठा काढण्यासाठी आणि ऊस उत्पादकांना थकबाकी देण्यास मदत करण्यासाठी सरकार 2019-20 च्या विपणन वर्षात 60 लाख टन साखर निर्यात करण्यासाठी 6 हजार 268 कोटी रुपयांचे अनुदान देत आहे. 2019-20 च्या विपणन वर्षात (ऑक्टोबर-सप्टेंबर) देशात 2.73 कोटी टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
साखर उत्पादनात भारत दुसऱया स्थानी
ब्राझीलनंतर भारत साखर उत्पादनात दुसऱया क्रमांकावर आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये साखर उत्पादनात आघाडीवर असली तरी मागील वर्षी या राज्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे 2019-20 या विपणन वर्षात साखर उत्पादनात थोडीफार घट निर्माण झाली होती.