मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांच्या प्रदेशातील वनांना आता पुन्हा जीवनदान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही वने इतिहास काळापासून प्रसिद्ध होती. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात व त्यानंतरही तेथील झाडांची वारेमाप तोड झाल्याने एकेकाळी सदाहरित वृक्षांनी नटलेला हा प्रदेश उजाड आणि रखरखीत बनला. जलसंपत्तीही येथे एकेकाळी अमूप होती. पण झाडांची तोड झाल्याने भूमीतील पाणीसाठाही संपला आणि येथे कायमची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली.
ही स्थिती पर्यावरणपेमींच्या लक्षात आली होती. त्यांनी त्यांच्या परीने उपाययोजना सुरू केली होती. वृक्षारोपण हाच वन संपत्तीच्या नाशावरचा एकमेव तोडगा आहे. त्यामुळे येथे कार्यरत असणाऱया ‘विद्या भारती’ या संस्थेने मोठय़ा प्रमाणावर त्या प्रदेशात उगविणाऱया वृक्षांची लागवड सुरू केली, त्यापैकी काही रोपे आता वृक्ष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा चार हजार रोपांचे वृक्ष होत आहेत. त्यामुळे या वन प्रदेशाला त्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होणार अशी आशा वाटत आहे.
अर्थात, येथे कोटय़वधी वृक्षांची तोड झाली आहे. त्याची भरपाई अवघ्या चार हजार वृक्षांनी होणार नाही हे खरेच. पण पुनःश्च हरिओम म्हणण्यासाठी हा प्रारंभ प्रेरणादायी आहे. या चार हजार वृक्षांमधूनच पुढच्या व्यापक वनीकरणाच्या उपक्रमाचा मार्ग जाणार आहे. या भागात चार कोटी वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची महत्वाकांक्षा आहे. ही योजनाही