पाटबंधारे खातेही डाराडुर
मळी टाकताना डंपरचा धक्याने शेडची भिंत हालली
पोलीस ठाण्यापर्यंत गेले प्रकरण
प्रतिनिधी / सातारा
धोम धरणाच्या 7 नंबरच्या कॅनॉललगतच रस्त्याकडेला केमिकल मिश्रीत मळी काल सायंकाळी टाकण्यात आली. ही मळी टाकताना डंपर वळवत असताना दिव्यांग शेतकरी राजेंद्र कदम यांच्या शेतातील शेडच्या भिंतीला धक्का लागला. केमीकलची मळी टाकल्याने शेतीचे नुकसान होणार असून लगतच कॅनॉल असल्याने असल्याने कॅनॉलमध्येही त्या मळीचे पाणी जाणार आहे, अशी भिती राजेंद्र कदम यांनी व्यक्त केली आहे. त्याबाबत राजेंद्र कदम यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे समजते.
वाई येथील रविवार पेठेतील दिव्यांग शेतकरी राजेंद्र कदम यांची धोम कॅनॉलनजिक शेती आहे. तेथे जळणकाटूक ठेवण्यासाठी शेड आहे. लगतच मल्हारी पेठकर यांचीही शेती आहे. धोम कॅनॉलचा रस्ता असून त्या रस्त्याकडेला काल एका कारखान्यातून केमिकल मिश्रीत मळी डंपरमधून आणून टाकली गेली. मोकळे रान असताना डंपर नेमका त्या शेडाच्या बाजूनेच वळवत असताना राजेंद्र कदम यांच्या शेडाच्या भिंतीवर गेला. भिंत आतमध्ये सरकली गेली. याची माहिती राजेंद्र यांना ही माहिती समजताच त्यांनी तेथे जावून पाहणी केली. त्यांनी टाकण्यात आलेल्या केमीकल मिश्रीत मळीमुळे शेतीचे आणि कॅनॉलच्या पाण्यात मिसळल्यास पाण्यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. यावरुन पाटबंधारे विभागाने याची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच शेडच्या भिंतीप्रकरणी त्यांनी वाई पोलिसांत तक्रार केल्याचे समजते.
कारण नसताना कदम तक्रार करत आहेत
पाटबंधारे विभागाने तिथे खड्डा काढला होता. तिथला मुरुम उचलून कॅनॉलच्या भरावासाठी वापरला होता. त्या ठिकाणी अर्थव फौंडरीची वाळू आणि राख टाकून खड्डा बुजवला आहे. त्या तक्रारीत काही तथ्य नाही. कंपनीला आणि शेजाऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. त्यांचे झालेले नुकसान भरुन देण्याची जबाबदारी संबंधित ट्रकवाल्याने घेतली होती तरीही कारण नसताना कदम कंम्पलेट करत आहेत. ते आमचाच रस्ता वापरत आहेत आणि आमच्याच रस्त्यातून जातात आणि आमच्याच विरोधात तक्रार करतात.