ऑनलाईन टीम / गंगटोक :
बिहार, आसाम आणि सिक्कीम सह पूर्वेकडील राज्यांना सोमावरी रात्री 8 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. तीव्रता 5.4 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.
या भूकंपाचे केंद्र भारत – भूतान सीमेजवळ गंगटोक सांगितले जात आहे. या भूकंपाचा फटका सर्वाधिक बिहारला बसला. बिहार राज्यातील अररिया, पाटणा, किशनगंजमधील लोकांना भूकंपाचे हादरे बसले. यांनतर अनेक लोक भीतीने बाहेर पडले होते. पहिल्या मोठ्या धक्क्यानंतर अनेकांना सौम्य धक्क्याचीही जाणीव झाली.