पोलीस दलाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह,
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना बाधिताच्या मृत्यूनंतर सिव्हिल हॉस्पिटल समोर जमावाचा उदेक झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमिवर पोलीस दलाने चन्नम्मा सर्कलपासून कोल्हापूर सर्कलकडे जाणारी वाहतूक अडविली आहे. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतुक बंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
चन्नम्मा सर्कल जवळ बॅरिकेडस् उभे करुन सदाशिवनगर, नेहरुनगर, एपीएमसी, कोल्हापूर सर्कलकडे जाणाऱया वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तर टी.बी.वॉर्डजवळ दोन्हीकडे बॅरिकेडस् उभे करुन चन्नम्मा सर्कलकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन्ही बाजुला वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहे.
बुधवारी रात्री कोरोना बाधिताच्या मृत्यूनंतर दगडफेक, रुग्णवाहिका जाळल्याची घटना घडली होती. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल भोवतीची गर्दी टाळा, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली होती. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूकच बंद केली आहे. त्यामुळे पोलीस व नागरिक यांच्यात रोज खटके उडत आहेत.
या संबंधी नागरिकांना किंवा प्रसिध्दी माध्यमांना कोणतीच कल्पना देण्यात आली नाही. स्मार्टसिटीच्या कामानिमित्त अनेक ठिकाणी रस्ते अडविण्यात आले आहेत. आता चन्नम्मा सर्कलपासून कोल्हापूर सर्कलकडे जाणारा रस्ता अडविल्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱयांची मोठी गैरसोय होत आहे.
जर पोलीस अधिकाऱयांना हा मार्ग बंदच करायचा होता तर नागरिकांना सूचना देवून पर्यायी मार्ग सुचविण्याची गरज होती. कोणताही मार्ग बंद करण्यापूर्वी पर्यायी मार्ग सुचवून नागरिकांना आवाहन केले जाते. कसलीही माहिती न देता दोन दिवसांपासून मुख्य रस्ता अडविण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालक पोलीस दलाच्या नावाने शिंगमा करीत आहेत.
म्हणे 144 आहे म्हणून रस्ता बंद- 24 डीआय 43
यासंबंधी गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या डीसीपी यशोदा वंटगोडी यांच्याशी संपर्क साधला असता सिव्हिल हॉस्पिटल परिसरात 144 कलम जारी आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात या परिसरात जमावबंदीचा आदेश नसल्याचे वरि÷ अधिकाऱयांनी सांगितले. जमावबंदी लागु आहे तर केवळ या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या मार्गावरील सर्व आस्थापने सुरु आहेत. वाहतूक मात्र कशासाठी बंद करण्यात आली? याचा उलगडा झाला नाही. कोणत्याही नियोजनाशिवाय व नागरिकांना कसलीच माहिती देण्याआधी प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.