संरक्षणाबाबत वनखात्यासमोर आव्हान : कुशल कर्मचाऱयांची नियुक्ती आवश्यक
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील सुरल व आजुबाजुच्या परिसरामध्ये तीन वाघांचा अधिवास असल्याचे स्पष्ट झालेले आहे. दोन दिवसांपूर्वी एका वाघाची हालचाल कॅमेऱयामध्ये कैद झालेली आहे. यामुळे आता वनखात्याने कुशल कर्मचाऱयाच्या माध्यमातून सदर वाघांच्या हालचालींवर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी वनखात्याच्या यंत्रणेने आता गांभीर्याने याकडे लक्ष देण्याची मागणी केलेली आहे. ज्या ठिकाणी वाघ असल्याचे सिद्ध झालेले आहे त्या ठिकाणी गांभीर्याने देखरेख ठेवण्याची मागणीही केरकर यांनी केली आहे.
म्हादई अभयारण्यात वाघांचा अधिवास
म्हादई अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये वाघांचा अधिवास असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले आहे. अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेऱयाच्या माध्यमातून वाघांचा अधिवास असल्याचे स्पष्ट झालेले आहे. जानेवारी महिन्यामध्ये ठाणे पंचायत क्षेत्रातील गोळावली या ठिकाणी पाच वाघांची हत्या करण्याचा प्रकार उघडकीस आलेला होता. यामुळे वाघांच्या सुरक्षेच्या संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. पाच वाघांची हत्या करण्यात आल्यानंतर शिल्लक राहिलेल्या वाघांचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे.
सुरल व आजूबाजूच्या परिसरामध्ये 23 व 30 जून रोजी पट्टेरी वाघ फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भाचे फोटो नुकतेच व्हायरल झालेले आहेत. यामुळे पुन्हा एकदा वाघांचे अस्तित्वासंदर्भात माहिती मिळाली आहे.
‘तो’ व्हिडिओ दिशाभूल करणारा : राजेंद्र केरकर
एका व्हिडिओमध्ये एक पट्टेरी वाघ डरकाळय़ा फोडीत फिरत असल्याचे दिसत आहे. मात्र सदर व्हिडिओ आंध्र प्रदेशातील असल्याचे स्पष्ट झालेले आहे. अज्ञाताने सदर व्हिडिओ एडिट करून सदर पट्टेरी वाघ सत्तरी तालुक्मयातील पाल व माळोली गावात फिरत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केलेला असून पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचे म्हणणे आहे..
वाघाने घेतला होता म्हशीचा बळी
सुरल व परिसरातील भागांमध्ये तीन वाघांचा अधिवास आहे. मे महिन्यामध्ये सदर भागात एका म्हशीचा वघाने बळी घेतला होता. यावेळी वन खात्याच्या यंत्रणेने शीघ्रगतीने कागदपत्रे सोपस्कार करून संबंधित म्हशीच्या मालकाला आर्थिक मदत दिली होती. त्यानंतर पुन्हा आणखी एक प्रकरण घडले होते. त्यासंदर्भात कागदोपत्री सोपस्कार करण्याचे काम सुरू असून त्यालाही लवकरच आर्थिक मदत मिळणार असल्याचे राजेंद्र केरकर यांनी स्पष्ट केलेले आहे.
पर्यटकांना रोखण्याची गरज सध्या पावसाळी मोसम सुरू आहे. वेगवेगळय़ा धबधब्यांवर मोठय़ा प्रमाणात पर्यटक जातात. घरदाट जंगलामध्ये जाणाऱया पर्यटकांना पट्टेरी वाघामुळे धोका निर्माण होणार असल्यामुळे वन खात्याच्या यंत्रणेने सध्यातरी धबधब्यांवर जाण्यापासून पर्यटकांना रोखण्याची आवश्यकता आहे. यापुर्वी सुरल येथे वाघीण व दोन बछडे यांचे अस्तित्व उघडकीस आले आहे. मात्र काही दिवसांनी त्यांचा अधिवास महाराष्ट्रातील मांगेली येथे असल्याचे निदर्शनास आले.