बेंगळूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याचे चित्र मागील चार दिवसांपासून आहे. राज्यात सोमवारी 39,305 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 32,188 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. रुग्णसंख्या कमी होत असतानाच संसर्गमुक्त होणाऱयांचा आकडा वाढला असून ही बाब राज्याच्या दृष्टीने दिलासादायक आहे. मागील चोवीस तासांमध्ये 1,24,110 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण 31.66 टक्के इतके होते. राज्यात सोमवारी 596 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 19,73,683 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 19,372 जणांचा मृत्यू झाला. तर एकूण 13,83,285 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Next Article ऑक्सिजन, रेमडेसिवीरचे गरजेनुसार वितरण करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.