जिल्हाधिकाऱ्यांना माजी सरपंच संजय देसाई यांचे निवेदन. मंजूर रस्ता न झाल्यास आंदोलनाचा इशारा
वार्ताहर / कुंभोज
हिंगणगाव ता. हातकणंगले येथे 25- 15 मधुन धरण्यात आलेला रस्ता अन्य ठिकाणी करण्यात आल्याने माजी सरपंच संजय देसाई गट व विद्यमान ग्रामपंचायत बॉडी यांच्यामध्ये काही काळ तणावाचे वातावरण बनले, यावेळी माजी सरपंच संजय देसाई यांनी सदर रस्ता विद्यमान आमदार राजू बाबा आवळे यांच्या आमदार फंडातून मंजूर झाला असून, तो गावात ज्या ठिकाणी मंजूर झाला आहे. त्या ठिकाणी करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कोल्हापूर व बांधकाम विभाग हातकलंगले यांना देण्यात आला आहे. सदर नामंजुर कामाचे ठेकेदारचे बिल देऊ दिले जाणार नाही असा इशारा दिला.
गावातील अंतर्गत वाद मिटवणेही ग्रामपंचायतीची जबाबदारी असून सदर वादग्रस्त असणाऱ्या रस्त्याचा वाद ग्रामपंचायत मिटवु न शकल्याने, सदर रस्ता मंजुर ठिकाणी नकरता अन्य ठिकाणी गावात करण्यात येत असल्याने आमचा त्याला विरोध असून विद्यमान आमदार यांच्या 25 -15 च्या फंडातून पाच लाख रुपये निधीचा रस्ता मंजूर झाला आहे. सदर रस्ता मंजुरी ठिकाणी न करता तो स्मशानभुमी व नदीकडे जाणाऱा रस्ता करण्यात येत असून, स्मशानभूमी नदीकडे जाणारा रस्ता गाव अंतर्गत येत नाही सदर रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असून यासाठी आमदार फंडातून निधी मंजूर करावा व सदर रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे ,चालु करण्यात येणाऱ्या रस्ताला आमचा विरोध नसून, मंजुर निधी जा रस्त्यासाठी मंजूर झाला तोच रस्ता मंजुर निधीतून करण्यात यावा अशी मागणी. ग्रामपंचायत हिंगणगाव व सदर कामाचे ठेकेदार यांच्याकडे आम्ही केली होती, परंतु आमचे मागणीकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी सदर रस्ता मंजूर ठिकाणी न करता अन्य ठिकाणी करण्यास सुरुवात केली आहे. चालु रस्ता नियमावली डावलून केला जात असल्याने सदर रस्त्याचे काम थांबवण्यात यावे, तसेच सदर रस्ता कामाचे ठेकेदारचे बिल काढण्यात येऊ नये अशी मागणी बांधकाम विभागाकडे माजी सरपंच संजय देसाई यांनी केली आहे.
याबाबत ग्रामपंचायत हिंगणगाव यांनी खुलासा करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच संजय देसाई यांनी ग्रामपंचायत हिंगणगाव यांना दिला आहे.याबाबत सदर रस्त्याचे काम संजय देसाई गटाच्या वतीने बराच काळ बंद पाडण्यात आले.
हिंगणगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र मिळून गाव विकासासाठी प्रयत्न करावेत, सदर गावातील अंतर्गत रस्त्यांचा वाद एकत्र बसून मिटवावा तसेच, मोठ्या प्रमाणात गावासाठी फंड आणून गावाचा सर्वांगीण विकास साधावा, त्यात गटातटाचे राजकारण करू नये असे मत हिंगणगाव येथील काही जाणकार व्यक्तीने तरुण भारतशी बोलताना व्यक्त केले.