नवी दिल्ली
ऑक्टोबरअखेर संपलेल्या व्यापारी वर्ष 2020-21 मध्ये भारताने 131.3 लाख टन इतक्या खाद्यतेलाची आयात केली असल्याचे समजते. किंमतीच्या तुलनेत पाहता आयात 63 टक्के वाढत 1.17 लाख कोटी रुपयांची राहिली आहे. तेल आयातीचे व्यापारी वर्ष नोव्हेंबर ते ऑक्टोबर असे मानले जाते. याआधीच्या 2019-20 व्यापारी वर्षात 135 लाख टन इतक्या खाद्यतेलाची आयात करण्यात आली होती.