साल 2020 जरी अर्थव्यवस्थेसाठी किंवा सामाजिक आरोग्याच्या बाबतीत चिंताजनक असले तरी भारतातील उच्च शिक्षण प्रक्रियेसाठी मात्र अतिशय दिलासादायक ठरावे. यावषी गेल्या दशकभरातील उच्च शिक्षण गुणवत्ता क्रमवारीत आपण 8 स्थानांनी सुधारणा केली असून 2010 मधील रोजगार वाढ क्षमता श्रेणीच्याबाबतीत 23 व्या स्थानांवरून 15 व्या स्थानापर्यंत मजल मारली. आपल्या देशातील उच्च शिक्षण व्यवस्था आता जागतिक स्तरावरील अव्वल 15 देशांमध्ये गणली जात असून रोजगारक्षम पदवीधर निर्माण करणाऱया देशांमध्ये आपल्याला मानाचे स्थान मिळाले आहे. दुसरी चांगली बातमी म्हणजे आपल्या देशातील विद्यापीठांनी जगातील अव्वल 250 विद्यापीठांमध्ये आपले प्रतिनिधित्व उल्लेखनीयपणे वाढवले असून 2019 मध्ये 4 विद्यापीठांपासून 2020 मध्ये तब्बल 6 विद्यापीठांचा समावेश जागतिक क्रमवारीत होतो.
जगभरातील बऱयाच संस्था अगदी वर्षभर उच्चशिक्षण व्यवस्थेतील संस्थांच्या शैक्षणिक व बिनशैक्षणिक गुणवत्तेच्या मूल्यांकनासाठी अनेक निकषांवर जगातील सर्वोत्कृष्ट स्थानांसाठी गुंतलेल्या असतात. नामांकित संस्थांच्या याद्या अशाप्रकारे वार्षिक पद्धतीवर प्रसिद्ध केल्या जातात. त्यापैकी सर्वात प्रति÷ित जागतिक विद्यापीठांची क्रमवारी यादी ‘टाईम्स हायर एज्युकेशन’ या संस्थेची भागीदारी असलेल्या ग्लोबल एम्प्लॉयबिलिटी सर्व्हे अँड रँकिंग (जागतिक रोजगार क्षमता सर्वेक्षण व मानांकन) 2020 या नावाखाली व क्वॅक्वेरेली सायमंड्स (क्मयू एस) रँकिंग 2020 यांनी आपल्या क्रमवारी याद्या गेल्या महिन्याच्या शेवटी प्रसिद्ध केल्या. त्यात आपल्या देशाला व्यवस्थित प्रतिनिधित्व मिळाले.
जागतिक रोजगार क्षमतेबद्दल विद्यापीठांच्या यादीत विश्वातील रोजगारयोग्य शिक्षण देणाऱया संस्थांची क्रमवारी ठरविली जाते. या वषीच्या यादीत अमेरिका व इंग्लंडमधील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांची नोकरी सुलभतेच्या बाबतीत कमालीची घसरण नोंदवली. अमेरिका व इंग्लंड हे देश तसे उच्चशिक्षणाचे माहेरघरच. रोजगार क्षमता वाढीमध्ये या दोन्ही देशांच्या शैक्षणिक संस्थांची झालेली घसरण गेल्या दशकभरातील काळात रोजगार सुलभता हा विषय अधिक गंभीरपणे घेतला नाही हाच अर्थ निघतो. परिणामी उच्च शिक्षणासाठी अमेरिका व इंग्लंड व्यतिरिक्त अन्य देश उच्च शिक्षणोत्सुक विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहेत हा निकष येथे निघतो.
रोजगार क्षमतेविषयीच्या वरील मानांकन यादीनुसार भारतातील विद्यापीठांनी सरशी सिद्ध केली ही आनंदाची बाब ठरावी. या सर्वसमावेशक अहवालानुसार गेल्या दशकभरात रोजगार सुलभता वाढीसाठी समस्पर्धक देशांमध्ये जर्मनी देशाला तिसऱया स्थानाचे मानांकन, चीनला 5वे स्थान तर दक्षिण कोरियाला 9 वे स्थान प्राप्त झाले आहे. तुलनेत अमेरिकेची गुणसंख्या गेल्या 10 वर्षात तब्बल 51…नी घसरली तर इंग्लंडची गुणसंख्या 46…नी घसरून गेल्या वषीच्या दुसऱया स्थानावरून यावषी चौथ्या स्थानापर्यंत घसरण झाली. सर्वात सरशी झाली ती चीनची. गेल्या दशकात चीन देशाची गुणसंख्या वाढली ती अचंबित करणाऱया 132 टक्क्मयांनी!
जगभरातील उच्चशिक्षण संस्थांपैकी कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीला प्रथम, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीला द्वितीय तर हावर्ड युनिव्हर्सिटीला तिसरे स्थान मिळाले. तिन्ही विद्यापीठे अमेरिकेतील आहेत हे विशेष. यापेक्षाही विशेष कामगिरी ठरली ती आयआयटी दिल्ली (भारतीय प्रौद्यौगिकी संस्था) यांची. 2014 मधील 149 स्थानावरून मजल मारत 2020 साली आयआयटी दिल्ली पोहचली 27 व्या स्थानावर, तर आयआयटी मुंबईने 25 स्थान पार करत सर्वोत्कृष्ट 150 क्रमवारीत पदार्पण करत 128 वे स्थान मिळविले. 2019 मध्ये आयआयटी मुंबईला 153 वे स्थान मिळाले होते. आयआयटी खडगपूर व ऍमिटी विद्यापीठाने विश्वातील सर्वोत्कृष्ट 250 व्या क्रमवारीत प्रवेश मिळवत अनुक्रमे 195 व 236 वे स्थान मिळविले.
कोविडच्या छायेत देशभरात रोजगार-रोजंदारी कमकुवत होत असता नोकरी मिळविण्याच्या क्षमतेत वाढ करून विद्यार्थी व पालकांच्या वाढत्या अपेक्षा देशातील विद्यापीठाने पूर्ण केल्या आहेत. देशातील रोजगार सुलभता वाढीमुळे भारतातील विद्यार्थ्यांच्या अपेक्षा अधिकच उत्तेजित झाल्या आहेत.
वर उल्लेख केलेल्या रोजगार सुलभता सर्वेक्षणाबरोबरीनेच क्मयूएस 2020-21 जागतिक क्रमवारीत भारताने चांगली कामगिरी नोंदविली. क्मयूएस क्रमवारीत जगभरातील शैक्षणिक संस्थांच्या वैशिष्टय़ीकृत सुविधा, अभ्यासक्रम, विद्या शाखा, शिक्षकांचे प्राविण्य, साधनसामग्री आदी निकषांवर एकमेकांशी स्पर्धा असते. अशा या क्मयूएस क्रमवारीत भारतातील 10 विद्यापीठांनी मानांकने प्राप्त केली आहेत.
सर्वात विशेष बाब म्हणजे क्मयू एसमधील देशातील 10 पैकी 10 संस्था सरकारी मालकीच्या असून खासगी संस्था सरकारी उच्चशिक्षण संस्था गुणवत्तेबाबत सरस असतात या (गोड) समजाला गैर ठरविले आहे. वरील 10 पैकी 5 संस्था 5 आयआयटी संस्था असून 6वी संस्था बेंगलोर येथील आयआयएससी ही ठरली. आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, मद्रास, खडगपूर व आयआयटी कानपूर अशा 50-60 वर्षांपेक्षा जास्त अस्तित्व असणाऱया संस्था देशातून अव्वल ठरल्या. गेल्या 10-15 वर्षांत स्थापन झालेल्या आयआयटी रुर्की, गुवाहाटी व आयआयटी हैद्राबाद यांना देशात 7 वे, 8 वे व अनुक्रमे 10 वे स्थान मिळाले. दुर्दैवाने देशीतल 790 विद्यापीठांपैकी फक्त दिल्ली युनिव्हर्सिटी हे एकमेव विद्यापीठ सरस ठरून 9 वे स्थान प्राप्त झाले. आयआयटी मुंबई ही देशभरातील उच्चशिक्षण संस्थांपैकी सर्वोत्कृष्ट उच्चशिक्षण संस्था ठरली. भारतात एक नंबरवर असणाऱया या संस्थेचे नामांकन विश्वयादीत 172 वे ठरते. यावरून आपल्या संस्थांना पुढे केवढी मजल मारावी लागेल व स्पर्धा किती तीव्र असावी याची कल्पना यावी. तंत्रज्ञान शिक्षण व संशोधनाबाबत आयआयटी मुंबई विदेशी सामंजस्य असणारी देशातील सर्वात जुनी संस्था असून त्यात 10,000 विद्यार्थी शिक्षण घेतात तर तब्बल 1,000 शिक्षकवर्ग विद्यादान करतात. 1909 साली टाटा कुटुंबीयांनी उभारलेली आयआयएससी बेंगलोर विश्वात 185 व्या स्थानावर असून आयआयटी दिल्ली 193, आयआयटी मद्रास 275 तर 1922 साली स्थापन झालेले दिल्ली विश्वविद्यालय देशात 7 व्या तर विश्वात 501-510 स्थानांमध्ये व्याप्त आहे.
गेल्या वर्षभरात भारताने उच्चशिक्षण गुणवत्ता मानांकनात चांगली श्रेणी प्राप्त केली असली तरीही जागतिक स्थानाबाबत आपण तसे पिछाडीवरच आहोत. याबाबत दक्षता हवी. आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट दहा शैक्षणिक संस्था जागतिक क्रमवारीत 150 स्थानांमध्ये नसावीत हे सरकारी बाबूगिरीने केलेल्या पिछाडीचे द्योतक ठरावे. उच्च संशोधनाबाबतची आपली उदासीनता त्यास कारणीभूत ठरावी. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या एका अहवालानुसार जगभरातील सर्वोच्च 10,000 संशोधकांमध्ये भारतीयांचे स्थान अतिनगण्य किंवा 0.57… एवढे मर्यादित आहे. तुलनेत चिनी संशोधक 4…च्या प्रमाणात तर अमेरिकी संशोधकांची 40…ची आघाडी सरस ठरते. पुढील वाट जरा बिकटच असली तरीही साधनसुविधांच्या कमतरतेवर आघाडीने मात करत आपण सोडत असलेली पिछाडी अभिनंदनीय आहेच, यात दुमत असण्याचे कारण नसावे. गरज आहे सातत्य राखण्याची व कार्यवेग वाढविण्याची.
डॉ. मनस्वी कामत