बेळगाव, सौंदत्ती तालुक्मयात प्रादुर्भाव : मुक्त होणाऱया जनावरांची संख्या समाधानकारक : गाय-बैलांना लम्पी प्रतिबंधक लस
प्रतिनिधी /बेळगाव
लम्पिस्कीन या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढला आहे. विशेषतः बेळगाव आणि सौंदत्ती तालुक्मयांतील 48 गावांमध्ये या रोगाची जनावरे आढळून आली आहेत. त्यामुळे शेतकऱयांसमोर चिंता निर्माण झाली आहे. आतापर्यंत 401 जनावरांना या रोगाची लागण झाली असून 44 जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. सुरुवातीच्या काळात तातडीने उपचार करण्यात आल्याने या आजारातून बरे होणाऱया जनावरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पशुसंगोपनला दिलासा मिळाला आहे.
जिल्हय़ात पाळीव जनावरांची संख्या 28 लाख आहे. त्यापैकी गोवंशीय जनावरांमध्ये या रोगाची तीव्रता अधिक आहे. बेळगाव आणि सौंदत्ती तालुक्मयातील 401 जनावरांना लागण झाली आहे. त्यापैकी 399 गायी आणि बैल आणि दोन म्हशींचा समावेश आहे. बेळगाव तालुक्मयाच्या पूर्व भागात या रोगाची जनावरे अधिक प्रमाणात आढळून आली आहेत. आतापर्यंत 20 जनावरांचा या रोगाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
तालुक्मयात केवळ पूर्व भागातच या रोगाचा फैलाव अधिक असल्याने लागण झालेल्या जनावरांची संख्या वाढत आहे. दरम्यान, बाधित गावे वगळून इतर गावांतील जनावरांना विशेषतः गाय आणि बैलांना लम्पी प्रतिबंधक लस दिली जात आहे.
तालुक्मयाच्या पूर्व भागातच फैलाव अधिक
बेळगाव तालुक्मयात पाळीव जनावरांची संख्या 1 लाख 78 हजार आहे. त्यापैकी पूर्व भागातीलच जनावरांना लागण दिसून येत आहे. विशेषतः बसरीकट्टी, शिंदोळी, सांबरा, निलजी, मुतगा, बसवन कुडची, सुळेभावी आदी गावांतून रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. दरम्यान, पशुसंगोपनने रोग नियंत्रणात आणण्यासाठी
रॅपिड ऍक्शन पथकाच्या माध्यमातून बाधित जनावरांच्या गोठय़ापर्यंत जाऊन तातडीने उपचार केले जात आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये लागण झालेल्या जनावरांची संख्या अधिक आहे. शिवाय मृत पावणाऱया जनावरांची संख्याही अधिक आहे. त्या तुलनेत बेळगाव जिल्हय़ात लागण झालेल्या जनावरांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे.
लम्पीच्या खबरदारीसाठी जनावरांचे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. रोग नियंत्रणात आल्यानंतर किंवा समूळ नष्ट झाल्यानंतरच बाजार खुले केले जाणार आहेत. जिल्हय़ामध्ये लम्पि प्रतिबंधक लस दिली जात आहे. केवळ बेळगाव व सौंदत्तीत लागण झालेली जनावरे आढळत असली तरी संपूर्ण जिल्हय़ातच प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
रोग पुन्हा फैलावण्याची चिंता
मृत पावलेल्या जनावराला रस्त्याशेजारी उघडय़ावर टाकले जात आहे. त्यामुळे रोग पुन्हा फैलावण्याची चिंता व्यक्त होत आहे. दगावलेल्या जनावरांना दफन करावे, अशी मागणी होत आहे.
संपूर्ण जिल्हय़ात खबरदारी
जिल्हय़ात केवळ बेळगाव आणि सौंदत्ती तालुक्मयात लम्पिस्कीन रोगाची जनावरे आढळून आली आहेत. शिवाय खबरदारी म्हणून संपूर्ण जिल्हय़ात रोग प्रतिबंधक लस पोहोचविण्यात आली आहे. शिवाय लागण झालेली जनावरे बरी होण्याचे प्रमाण वाढत आहे.
– डॉ. राजीव कुलेर (उपनिर्देशक, पशुसंगोपन खाते)
लम्पीने दूध उत्पादनावर परिणाम
बाधित जनावराच्या दूध क्षमतेत घट : पशुपालकांना फटका
जिल्हय़ात लम्पिस्कीन रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱयांचे अर्थकारण फिसकटले आहे. दरम्यान, लागण झालेल्या सुरुवातीच्या काळात काळजी न घेतलेल्या जनावरांची दूध क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील दुग्धोत्पादनात घट झाल्याचे दिसत आहे.
जिल्हय़ात पाळीव जनावरांची संख्या 28 लाख 9 हजार 109 इतकी आहे. त्यामध्ये गायी, म्हशी, बैल, गाढव, घोडा, शेळय़ा-मेंढय़ा, मांजर, कुत्रा आदींचा समावेश आहे. विशेषतः गाय आणि म्हशींपासून दुधाचे उत्पादन होते. मात्र, जिल्हय़ातील शेकडो जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. लागण झाल्यास जनावर अशक्त होऊन दूध देणे बंद करते. त्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. जिल्हय़ात दररोज 16 लाख लीटर दुधाचे उत्पादन होते. काही दिवसांपासून दूध उत्पादन वाढले होते. मात्र, लम्पीचे संकट आल्याने पुन्हा दूध उत्पादनात घट झाली आहे.
जिल्हय़ात बाधित जनावरे वगळून सर्वत्र लम्पि प्रतिबंधक लस दिली जात आहे. लम्पि रोग आटोक्मयात येत असला तरी ज्या जनावरांना या आजाराची लागण झाली आहे, त्यांच्या दूध उत्पादनात 20 ते 30 टक्क्मयांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. गाय वर्गातील जनावरांना या रोगाचा अधिक प्रादुर्भाव झाला आहे.
जिल्हय़ाच्या दूध उत्पादनावर परिणाम नाही
जिल्हय़ात केवळ बेळगाव आणि सौंदत्ती तालुक्मयात लम्पिस्कीन रोगाची जनावरे आढळून आली आहेत. इतर तालुक्यांमध्ये एकही जनावर आढळून आले नाही. त्यामुळे जिल्हय़ाच्या दूध उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नाही.
– डॉ. राजीव कुलेर (उपनिर्देशक, पशुसंगोपन खाते)