ऑनलाईन टीम / मुंबई :
विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणावरुन भाजप आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे सभागृहात गोंधळ घालणाऱ्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले.
आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, संजय कुटे, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया, पराग अळवणी, राम सातपुते अशी निलंबित करण्यात आलेल्या आमदारांची नावे आहेत.
मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरीकल डेटा उपलब्ध व्हावा, असा ठराव मांडला आणि तो मंजूर केला. भुजबळांनी पुराव्यानिशी देवेंद्र फडणवीसांचा काळात झालेल्या पत्रव्यवहारच सभागृहात वाचून दाखवला. त्यावर फडणवीस हे बोलण्यासाठी उभे राहिले पण सभापती भास्कर जाधव यांनी त्यांना बोलू दिले नाही. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळातच ओबीसी आरक्षणाबाबतच ठराव मंजूर करण्यात आला. विधानसभा स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देवेंद्र फडणवीस गेले असताना विरोधी आमदार आणि सत्ताधारी आमदार यांच्यात धक्काबुक्की झाली होती.