वाढीव जीएसटीबाबत मार्चपर्यंत फेरविचार करण्याचा निर्णय : तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार
प्रतिनिधी /बेळगाव
जीएसटीच्या नव्या अधिसूचनेनुसार कपडय़ाच्या जीएसटीवर 12 टक्क्मयांपर्यंत वाढ करण्यात येणार होती. यामुळे कापड व्यावसायिक, उत्पादक व ग्राहकांना फटका बसणार होता. त्यामुळे याला देशभरातील कापड उद्योग जगतातून कडाडून विरोध झाला. बेळगावमधूनही बेळगाव टेडर्स फोरमच्या माध्यमातून केंद्रीय पातळीवरील अधिकाऱयांपर्यंत विरोध दर्शविण्यात आला होता. वाढता विरोध लक्षात घेऊन अधिसूचनेवर फेरविचार केला जाणार आहे. यामुळे बेळगावच्या व्यापाऱयांनी शुक्रवारी आनंदोत्सव साजरा करत जीएसटी अधिसूचना रद्द होणार नाही, तोवर संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
देशात कापड व्यवसाय हा एक मोठा उद्योग आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या 18 कोटी नागरिक या व्यवसायावर अवलंबून आहेत. 18 नोव्हेंबरला केंद्र सरकारने अधिसूचना काढत कापडावरील 5 टक्के असणारा जीएसटी 12 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. याला देशभरातून तीव्र विरोध झाला. गुजरात, चेन्नई, बनारस यासह इतर भागातील कापड उत्पादकांनी विरोध दर्शविला होता. 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार होती. परंतु विरोध पाहून मार्च महिन्यापर्यंत फेरविचार केला जाणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. त्यामुळे बेळगावमध्ये पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
बेळगाव टेडर्स फोरमने लावून धरला विषय
कापड व्यावसायिकांना फटका बसणार असल्याने बेळगाव टेडर्स फोरमने सर्वप्रथम आवाज उठविला. अध्यक्ष सतीश तेंडोलकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक जीएसटी अधिकाऱयांसह केंद्रीय अर्थमंत्र्यांपर्यंत विरोध केला होता. जीएसटी वाढल्यास व्यापारी व ग्राहकांना तोटा होणार, हे त्यांनी विविध अधिकाऱयांना समजावून दिले होते. हा विषय लावून धरल्याने बेळगावमधील इतर संघटनांनीही हा विषय लावून धरला.
यावेळी बेळगाव टेडर्स फोरमचे अध्यक्ष व बेळगाव क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे वरि÷ उपाध्यक्ष सतीश तेंडोलकर, सदस्य सुनील कटारिया, प्रशांत कळ्ळीमनी, राजू खोडा व राकेश कटारिया यांच्यासह बेळगाव टेडर्स फोरम व बेळगाव क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
बेळगावमध्ये आनंदोत्सव…
बेळगाव हे यंत्रमागधारकांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहर तसेच ग्रामीण भागामध्ये हजारो यंत्रमागधारक आहेत. ते ही कापड व्यवसायातील एक भाग आहेत. कापडावरील जीएसटीत वाढ झाली तर त्याचा फटका यंत्रमागधारकांनाही बसणार आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांनीही या निर्णयाला विरोध केला होता. या निर्णयावर फेरविचार केला जाणार असल्याने बेळगावमधील व्यापारी, विणकर यांनी आनंदोत्सव साजरा केला.