ऑनलाईन टीम/तरुण भारत
सांगलीनंतर आता बीडच्या परळी कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. १३ एप्रिल पर्यंत राज ठकरे (raj thackeray) यांना परळी कोर्टानं हजर राहाण्यास सांगितलं होतं. मात्र राज ठाकरे हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात दुसऱ्यांदा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे मशिदीवरच्या भोंग्यावर केलेल्या विधानांमुळे चर्चेत आले होते.
परळीत साल २००८ मध्ये राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्त्यांनी परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांना त्या केस संदर्भात न्यायालयाने अनेकदा हजर राहाण्यास सांगितलं मात्र सतत काहीनाकाही कारणं देऊन राज ठाकरे यांनी त्या तारखांना कोर्टात जाण्याचं टाळलं. सतत तारखांना गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला गेला होता.
जानेवारीत बीडच्या न्यायालयाने (beed court) राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट काढला होता. सध्या राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांना महत्व प्राप्त झालं आहे तसंच ते त्यांच्या अजामीपात्र वॉरंटलाही महत्व प्राप्त झालं आहे.