पशुसंगोपन खात्याच्या योजनेला पशुपालकांचा प्रतिसाद, जनावरांच्या सुरक्षिततेसाठी विमा आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
जनावरांच्या सुरक्षिततेचा विचार करून पशुसंगोपन खात्याने जनावरांसाठी विमा योजना सुरू केली आहे. जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन पशुपालकांनी आपल्या जनावरांचा विमा काढावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः खात्याने या विम्यामध्ये 50 टक्के अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे पशुपालकांना विमा काढणे सोयीस्कर होणार आहे.
पशुधनाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जनावरांचा विमा महत्त्वाचा आहे. यासाठी जनावरांच्या मालकाचे आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक आणि जनावरांसोबत मालकाचा फोटो आवश्यक आहे. पशुधन विमा पॉलिसीच्या कालावधीत पशुधनाचा मृत्यू, आजारपण, अपघात, आग, वीज पडणे, धूर, वादळ आणि दंगलीमुळे हानी झाल्यास नुकसान भरपाई दिली जाणार आहे. विशेषतः या विमा पॉलिसीमुळे संपूर्ण रक्कम मिळणार आहे.
जिल्हय़ात 28 लाख तर तालुक्मयात 1,78,000 इतकी संख्या आहे. यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळय़ा-मेंढय़ा, डुक्कर, गाढव, घोडा आदींचा समावेश आहे. त्यामुळे एखाद्यावेळी नैसर्गिक आपत्ती, आजारपण, अपघात आदी कारणांमुळे जनावरे दगाविल्यास या विमा पॉलिसीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांचा विमा उतरून आपली जनावरे सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन खात्याने केले आहे. पशुपालक एक आणि तीन वर्षांसाठी विमा पॉलिसी करू शकतात. या कालावधीत जनावर दगाविल्यास संपूर्ण रक्कम या पॉलिसीतून मिळणार आहे. या योजनेंतर्गत विमा हप्त्यामध्ये दारिद्रय़ रेषेवरील लाभार्थ्यांना 50 टक्के तर दारिद्रय़ रेषेखालील आणि मागासवर्गीय लाभार्थ्यांना 70 टक्के अनुदानाची सवलत दिली जाणार आहे.