अतिवाडात 8 ट्रॉली सुक्या चाऱयाचे नुकसान
प्रतिनिधी/ बेळगाव
अतिवाड येथे परसात साठवून ठेवलेल्या गवतगंजीला अज्ञातांनी आग लावल्याने सुमारे 8 ट्रॉली सुक्मया चाऱयाचे नुकसान झाले. संतू नागोजी पाटील यांची गवतगंजी जळाली असून शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. संपूर्ण गवत जळून खाक झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱयांसमोर चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राम पंचायत आणि तलाठय़ानी पाहणी करून नुकसानभरपाई देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
संतू पाटील हे 10 ते 15 जनावरांचे संगोपन करतात. त्यामुळे त्यांनी जनावरांसाठी 8 ट्रॉली सुका चारा साठवून ठेवला होता. मात्र अज्ञातांनी लावलेल्या आगीत संपूर्ण चारा जळून भस्मसात झाला आहे. त्यामुळे जनावरांना आता काय घालावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. दुपारी गवतगंजीला आग लागल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे काही मिनिटांतच संपूर्ण गवतगंजी जळाली. दरम्यान गावातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत गवतगंजी जळाली होती. शिवाय अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र काही उपयोग झाला नाही. साधारण 25 दिवसांपूर्वी सदर गवतगंजीला आग लावण्यात आली होती. दरम्यान जागृक युवकांमुळे वेळीच आग आटोक्मयात आली होती. मात्र शुक्रवारी लावलेल्या आगीत संपूर्ण गवतगंजी जळून खाक झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांतून हळहळ व्यक्त होत आहे.
यावेळी ग्रा. पं. सदस्य मल्लाप्पा पाटील, भरमा व्हरकेरी, आनंद जोतिबा पाटील, विजय भरमा पाटील, शिवा लक्ष्मण पाटील, जानबा मारुती मण्णूरकर, बाळू भरमा पाटील आदींनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्मयात आणली. त्यामुळे शेजारील गवतगंजींचे नुकसान टळले आहे.