सलग दुसऱ्या वर्षी प्रथम; पाच कोटींचे बक्षीस
कराड प्रतिनिधी
राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये कराड नगरपालिकेने 50 ते 1 लाख लोकसंख्येच्या गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. याबरोबरच 5 कोटी रूपयांचे बक्षिसही पटकावले आहे.
जागतिक पर्यावरण दिनी मुंबई येथे आयोजित केलेल्या सोहळय़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हे बक्षिस पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपमुख्याधिकारी विशाखा पवार, मुदस्सर नदाफ, आशिष रोकडे, अनिल गवळी, किरण कांबळे, कृष्णत कांबळे, स्वच्छतादूत अजित शिंदे आदींनी स्वीकारले. नगरपालिकेने गतवेळी अभियान 2.0 मध्ये राज्यात पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळवले होते. तर त्यापूर्वी अभियान 1.0 मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळवले होते.
सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांनी कराडकर यांचा अभिनंदन केले यापुढेही प्रथम क्रमांक मिळवण्याची कराड पालिकेची नगरपालिकेची तेवढी क्षमता आहे. त्यासाठी पालिकेने कामगिरीत सातत्य ठेवावे विविध संस्था आणि नागरिकांनी सहकार्य केल्याने पालिकेला यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया डाके यांनी दिली.
सलग तीन वर्षे या अभियानात पालिकेने सर्वच कारमगिरी केली आहे या तीन वर्षात सलग बक्षीस मिळाल्याने पालिकेला सुमारे 13 कोटी रुपये मिळाले आहेत पृथ्वी वायु जलग आणि आकाश यांनी स्वर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माजी वसुंधरा अभियानाचे आयोजन दरवर्षी शासनातर्फे करण्यात येत आहे.