सातारा प्रतिनिधी
कास तलावामध्ये बाधित झालेल्या रस्त्याची अद्याप पुन:र्निर्मिती न केल्याने अखेर कास पठारावरून येणारी काच बामनोलीची वाहतूक घाटाई मार्गे वळवण्याची नामुष्की प्रशासनासोबत च सातारा नगरपालिकेवर ओढवल्याचे दिसत आहे.
काच तलावच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून प्रगतीपथावर होते ते पूर्ण झाले असून यावर्षी धरणात पाण्याचा पूर्ण क्षमतेने साठा होणार असल्याने कास पठारावरून येणाऱ्या कास तलाव बांधणीचा मुख्य रस्ता धरणात बाधित झालेला आहे त्यावर पाणी आलेले आहे. संपूर्ण रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहे.
या मार्गावरून होणारी वाहतूक लांब पल्ल्याची असून कच्च्या मार्गावर वाहतूक जोखमीचे राहणार असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागणार आहे या मार्गावर वाहतुकीचा खेळखंडोबा होऊ एसटी वाहतुकीसह पर्यटनावर परिणाम होणार असल्याने स्थानिकातून नाराजी व्यक्त होत आहे.