प्रतिनिधी/ बेळगाव
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी चळवळ हातात घेणे गरजेचे आहे. तरच शेतकरी आणि कामगारांना गती येईल व त्यांचे प्रश्न मार्गी लागतील, असे उद्गार जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी काढले. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 73 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे ऍड. राजाभाऊ पाटील होते. प्रारंभी लाल बावटा ध्वजाचे पूजन नारायण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. एस. एल. चौगुले यांनी पूजन केले. सरस्वती पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पक्षाचे ज्ये÷ नेते भाई उद्धवराव पाटील, भाई दाजिबा देसाई, माजी आमदार व्ही. एस. पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन सरस्वती पाटील, बाळाराम पाटील, पुंडलिक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विलास घाडी आणि ऍड. राजाभाऊ पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. एल. आय. पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले आणि कार्याची माहिती दिली. यावेळी एन. बी. खांडेकर, नानू गोविंद पाटील, आर. आय. पाटील, कल्लाप्पा घाटेगस्ती, ऍड. आनंद पाटील आदी उपस्थित होते. बी. डी. मोहनगेकर यांनी आभार मानले..