साखरपा पोलीसांकडून दोघांवर गुन्हा संशयित चिकोडी
वार्ताहर/ ताम्हाने
कोकणातून पश्चिम महाराष्ट्र, पुणेसह कर्नाटकात मोठय़ा प्रमाणात गुरांची अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी होत्या. अनेकदा ग्रामस्थांनीच अशी वाहतूक उघडकीस आणली आहे. मात्र यापैकी न्यायालयात दोषी सापडण्याचे प्रमाण नगण्यच आहे. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर मुर्शी येथे पोलिसांनीच अशा वाहतुकीचा भांडाफोड केला असून दोन आरोपींना वाहन व गुरांसह ताब्यात घेतले आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर मुर्शी चेकपोस्ट येथे सोमवारी सायंकाळी गुरांच्या अवेध वाहतुकीचा हा प्रकार उघड झाला आहे. गुरांची अवैध वाहतूक करणाऱया बोलेरो गाडीसह 5 बैल व 1 गाय जप्त करण्यात आली आहे. देवरुख पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गडहिंग्लज व चिकोडी तालुक्यातील दोघाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर शशिकांत कुंभार (30, इंचनाक, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) व राजेंद्र बाळासाहेब भोसले (24, पडलेहार, ता. चिकोडी, जि. बेळगाव) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सुधीर व राजेंद्र आपल्या ताब्यातील बोलेरो घेऊन सोमवारी सायंकाळी 6.15 च्या सुमारास मुर्शी चेकपोस्ट येथे आली असता पोलिसांनी वाहनाची तपासणी व चौकशी केली. यावेळी गाडीत 5 बैल व 1 गाय असल्याचे आढळून आले.
लांजा तेलीवाडी येथून बैल व गाय घेवून ते बोलेरो गाडीतून कोल्हापूर जिल्हय़ात आजरा येथे जात असल्याचे त्यांनी ापोलिसांना सांगितले. मात्र चौकशीदरम्यान गुरे वाहतुकीचा कोणताही परवाना त्यांच्याजवळ नसल्याचे स्पष्ट झाले. या वाहतुकीबद्दल योग्य स्पष्टीकरणही ते पोलिसांना देऊ शकले नाहीत. त्यामुळे साखरपा दूरक्षेत्राचे पोलीस प्रशांत नागवेकर यांनी देवरुख पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. सुमारे 50 हजार किंमतीची बोलेरो, 54 हजार किंमतीची गाय व बैल अशा लाखाहून अधिक ऐवजासह दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी सुधीर व राजेंद्र यांच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ अधिनियम 1960 चे कलम 11 (1)(अ)(ड)(फ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119, मोटार वाहन कायदा कलम 66192, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक तपास पोलीस नाईक अपर्णा दुधाणे करीत आहेत.
कोकणातील गुरे अवैधपणे घाट माथ्यावर देउन विकण्याचे वा मांसासाठी वाप्र करण्याचे मोठे र्रकेट कार्यरत अस्याचे आरोप सातत्याने केले जात होते. काहीवेळा गरीब शेतकऱयाला लालूच दाखवून, काहीवेळा धाक दाखवून तर काहीवेळा चक्प् चोरलेल्या गुरांची परस्पर विक्री केली जात असल्याची चर्चा होती. विशिष्ट सणकाळात हे प्रकार वाढत असल्याचे काहींचे निरिक्षण होते. जिह्यात विविध ठिकाणी ग्रामस्थांनी असे प्रकार उघडकीस आणले व वाहने पकडूनही दिली. मात्र या प्रकरणांचे पुढे काय झाले हा संशोधनाचाच विषय ठरावा अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीच हा प्रकार उघडकीस आणल्याने गोप्रेमींकडून कौतुक केले जात आहे.