बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहरात जर मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी पकडले गेले किंवा चुकीच्या पद्धतीने मास्क घातला तर २०० रुपये ऐवजी १ हजार रुपये दंड तर ग्रामीण भागात त्याच नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल.
मंत्री डॉ.के.सुधाकर यांनी बुधवारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी याची घोषणा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रस्तावावर सखोल विचारविनिमयानंतर दंडाची रक्कम वाढविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याशी चर्चेनंतर ते गुरुवारी अधिकृत निर्देश जारी करणार असल्याचे सांगितले आहे.
मंत्री सुधाकर यांनी सर्वत्र जागरूकता मोहिम व आवाहन करूनही लोक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी दंड आकारणार आहेत.
विवाहसोहळा आणि इतर सांस्कृतिक समारंभात ५० हून अधिक लोकांच्या सहभागासह राजकीय, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांवर बंदी घातली जाईल. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आयोजक किंवा मालकांवर कारवाई होणार आहे.
पाच लोकांना बाजारात, मॉल्समध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्याची परवानगी दिली जाणार नाही. एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीमध्ये किमान सहा फूट अंतर अनिवार्य असेल. हे न केल्यास संघटना किंवा दुकान मालकांना दंड ठोठावला जाईल.