‘तरुण भारत’ दिवाळी अंकाचे रत्नागिरीत प्रकाशन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘तरुण भारत’ दिवाळी अंकाचे प्रकाशन सोमवारी रत्नागिरी विभागीय कार्यालयात मोठय़ा उत्साहात पार पडल़े जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, उपाध्यक्ष आणि लेखक संतोष प्रभू, यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘तरुण भारत’ च्या जिल्हा कार्यालयात कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम पार पडला.
कोवीड संकटातही चोखंदळ वाचकांसाठी माफक किंमतीमध्ये सर्वसमावेशक दिवाळी अंकाची निमिर्ती ‘तरुण भारत’ने केली आह़े हा अंक नेहमीप्रमाणे दर्जेदार व वाचनीय आह़े प्रथितयश लेखकांसह नवीन लेखकांना भक्कम व्यासपीठ या दिवाळी अंकाच्या माध्यमातून मिळाले आह़े यंदाचा दिवाळी अंक विविधांगी लेखनाने परीपूर्ण व संग्राह्य असल्याचे प्रतिपादन ऍड. दीपक पटवर्धन यांनी केले.
‘तरुण भारत’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन सर्व आवृत्ती कार्यालयात सोमवारी एकाच वेळी झाल़े रत्नागिरी येथील कार्यक्रमासाठी मान्यवरांसह ‘तरुण भारत’ आवृत्ती प्रमुख सुकांत चक्रदेव, प्रशासन अधिकारी सुमीत राऊत, वितरण व्यवस्थापक मिलिंद कुलकर्णी, जाहीरात व्यवस्थापक भूषण प्रभूदेसाई, ज्येष्ठ उपसंपादक विश्वेश जोशी, वितरण प्रतिनिधी संदेश सोहनी आदींसह ‘तरुण भारत’ परीवारातील सदस्य उपस्थित होते.
रत्नागिरी आवृत्तीच्या प्रारंभापासून ‘तरुण भारत’ चा वाचक म्हणून या वृत्तपत्राशी आपले भावनीक नाते असल्याचे संतोष प्रभू यांनी सांगितल़े दर्जेदार दिवाळी अंकाच्या माध्यमातून दर्जेदार साहित्यकृती देण्याची परंपरा ‘तरुण भारत’ने यंदाच्या दिवाळी अंकानेही कायम ठेवल्याने प्रभू म्हणाले. हा दिवाळी अंक अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध आहे. यातील दर्जेदार साहित्याचा आस्वाद वाचकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केल़े