प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठा संदर्भात भविष्यातील 2047 सालापर्यंतच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून या योजनेत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नव्या सुधारित पाणी योजनेत शीळ ते साळवीस्टॉप जलशुध्दीकरण पकल्पापर्यंत स्वतंत्र जलवाहीनी नव्याने टाकण्यात येणार आहे.
अशा योजनेतील महत्वाचे काम असलेल्या शीळ धरणाच्या ठिकाणी पंम्पीग हाऊसचे नूतनीकरण केले जात आहे. त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री दाखल झालेली आहे. याठिकाणी नव्याने स्टाटर मोटार, एएसबी पॅनेल, बेसबार पॅनेल, नवीन केबल जोडणीची कामे सुरू आहेत. येत्या 2 एपिलपर्यंत याठिकाणी 3 नवीन उच्च अश्वशक्तीचे जनरेटर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी अगोदर पासून 2 जुने जनरेटर कार्यरत आहेत. ही सर्व यंत्रणा जोडणीनंतर हे पंम्पीग हाऊस पूर्ण क्षमतेने गतीमान होणार आहे.