– कागलमध्ये गोकुळ दूध संघ प्रचारार्थ राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचा प्रचार
प्रतिनिधी/सेनापती कापशी
गोकुळ दूध संघाची सत्ता द्या, शेणात राबणाऱ्या माता-भगिनींना भाऊबीज सोन्याची करु असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचारात ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, सत्ताधारी 3, 13 आणि 23 तारखेला दूध बिले देत असल्याचे सांगत आहेत. गवळीसुद्धा दहा दिवस झाले की बिल देतो. यामध्ये तुम्ही नवीन काय केलं? तुमचा कारभार जर एवढा चोख आणि दूध उत्पादकांच्या हिताचा असेल तर मग निवडणुकीची भीती तुम्हाला का वाटते? असा सवालही मंत्री मुश्रीफ यांनी केला.
महादेवराव महाडिक यांना आम्ही सतत टँकरबद्दल विचारत होतो. काल त्यांनी आपले 40 टँकर असल्याची जाहीर कबुली दिली. ज्या ज्या संस्थांना त्यांचा स्पर्श झाला त्या सगळ्या संस्था बुडाल्या आहेत, अशी टीका पालकमंत्री पाटील यांनी केली.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, सत्ताधारी आघाडीचे नेते गोकुळ दूध संघ स्वतःच्या खाजगी मालकीचा करायला निघाले होते. परंतु, जिह्यातील दूध उत्पादकांच्या जनरेटÎामुळेच तो निर्णय मागे घ्यावा लागला. उमेदवार विश्वास नारायण पाटील व अरुण डोंगळे यांचीही भाषणे झाली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जि. प. सदस्य युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, विजय देवणे, विश्वास पाटील, अरूण डोंगळे, शशिकांत पाटील – चुयेकर, नविद मुश्रीफ, विरेंद्र मंडलिक, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, कागलच्या नगराध्यक्षा सौ. मानिक माळी यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.
पी. एन. पाटील यांना मी सांगत होतो तेच खरं झालं..!
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोकुळची निवडणूक महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र लढवावी, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे पी. एन. पाटील यांच्या बरोबर चर्चाही सुरु होती. त्या चर्चेमध्ये त्यांना म्हणालो होतो, साहेब तुम्ही म्हणता तसे होणार नाही. सत्तारूढ गटातील पॅनेलमध्ये तुमचा वरचष्मा राहणार नाही. यावर पी. एन. यांनी आत्मविश्वासाने, आपण सांगेल तेच होईल, असे सांगितले होते. पॅनेल जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी ज्या बातम्या दिल्या त्या पाहिल्यानंतर व वस्तुस्थिती पाहिल्यानंतर पी. एन. साहेब या पॅनेल रचनेमध्ये तुमचा वरचष्मा राहिला नाही. दुर्दैवाने, माझं खरं ठरलं..!
जिह्यातील ठराव धारकांकडून वाढता प्रतिसाद…
मी गोकुळच्या सर्व सभासदांना फोन करुन पॅनेल विजयी करण्याची विनंती करत आहे. कोणत्याही कामासाठी या, ग्रामविकास व कामगार विभाग माझ्याकडे आहे. विकासाने तुमच्या गावाचा चेहरामोहरा बदलून टाकू.
चोख व पारदर्शी कारभाराने संघ नावारुपाला आणू
सत्ताधारी गोकुळ कसा चालवला हे सांगत आहेत ते किती खोटं बोलत आहेत. ते परिवर्तनशिवाय कसे कळणार. पारदर्शी चोख कारभार व खर्चात बचतीमुळे आयुष्यभर माझ्या माता-भगिनी जनावरांच्या शेणामुतात राबून दूध उत्पादन करतात. त्यांचे योग्य माप त्यांच्या पदरात पडले पाहिजे. बघा आमच्या हातात सत्ता देऊन माझ्या तमाम दूध उत्पादक महिलांना पाच वर्ष दीपावली व भाऊबीज अशी देऊ की, भाऊराया कसे असावेत तर हसन मुश्रीफ, बंटी पाटील यांच्यासारखे असावेत असे म्हटले पाहिजे. तुमच्या श्रमाचे माप सोन्याने देऊ.
परिवर्तनाची शपथ घेऊया
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गेली 25 ते 30 वर्षे सातत्याने गोकुळबाबत टीका व चर्चा असते. ती म्हणजे उधळपट्टी आणि प्रचंड खर्चाची. उदाहरणार्थ: वासाचे दुध काढणे, दुधाची योग्य किंमत न देणे, मोठÎा लोकांच्याच टँकरना पाळी देणे, नोकऱयांमधील वरकमाई, मुंबई व पुण्याच्या दुध विक्री एजंटकडून वरकमाई घेतात अशा अनेक तक्रारी आहेत. आता हे सगळ बंद करूया. शपथ घेवूया व परिवर्तन करूया.