प्रख्यात चित्रकार संजय हरमलकर यांचे आवाहन : पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यास खूप संधी
मोरजी : कोकण भूमीचा निर्माता श्री परशुराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हरमल येथील परशुराम टेकडीच्या परिसरात परशुरामाच्या पावन स्मृती चिरंतन करताना गोवा सरकारने परशुरामाचा भव्य पुतळा उभारून पर्यटनस्थळ विकसित करावे अशी मागणी सुप्रसिद्ध गोमंतकीय चित्रकार तथा भाजप नेते संजय हरमलकर यांनी दैनिक तऊण भारत पाशी बोलताना केली. पर्यटनमंत्री रोहन खवटे यांनी याठिकाणी परशुरामाचे प्रतिक म्हणून केवळ बाणाची प्रतिकृती उभारण्याचे अलीकडेच वक्तव्य केले होते. त्या संदर्भात बोलताना हरमलकर यानी ही मागणी केली. स्थळाच्या परिसरात परशुरामाच्या आठवणींना उजाळा देणारी दृश्ये चित्राच्या रूपात कोरावीत त्यात गोमंतकीय कलाकारांना वाव द्यावा, असेही ते पुढे म्हणाले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व.मनोहर भाई पर्रीकर यांच्याकडे आपण या संदर्भात प्रस्ताव मांडला होता. तो प्रस्ताव त्यांना खुप आवडला होता. त्यानंतर स्व.मनोहर भाई केंद्रात गेले. तरी त्यांनी या प्रस्तावा बाबत माजी मुख्यमंत्री प्रा.लक्ष्मीकान्त पार्सेकर चर्चा करून त्या प्रस्तावाला मूर्त स्वरूप देण्याची सूचना करून आपल्याला पाठ पुरावा करण्यास सांगितले होते. त्यांनतर आपण माजी मुख्यमंत्री श्री पार्सेकर यांच्या सोबत एक दोन बैठका घेऊन पाठपुरावा केला होता मात्र त्याला मूर्त स्वरूप येऊ शकले नाही, असे हरमलकर यांनी सांगितले.
श्री परशुराम यांच्या पदस्पर्शाने हरमल टेकडी पावन झाली आहे. या ठिकाणी त्यांच्या स्मृती जतन करण्राया काही खुणा अध्याप जिवंत आहेत. हरमल समुद्र किन्रायाला दरवर्षी देशिविदेशी हजारो पर्यटक भेटी देत असतात. या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित केल्यास सरकारला सहज मोठ्याप्रमाणात महसूल प्राप्त होऊ शकतो. त्यासाठी अंदाजे 10 हजार चौ.मी.जागा आरक्षित करून 5 हजार चौ.मी.जागेत धनुष्यबाण धारी परशुरामाचा भव्य पुतळा उभारावा. त्यासाठी ऐखादी दुमजली इमारत इथे व्हावी. इमारतीवर भव्य पुतळा उभारावा. खाली त्यांचा इतिहास ताजा करणारी चित्रे दृश्ये चितारावीत. उरलेल्या जागी पर्यटक कुटीरे उभारावीत इको पर्यटनाला वाव द्यावा. त्यातून स्थानिकांना रोजगारही मिळेल, असे हरमलकर पुढे म्हणाले. परशुरामाच्या पदस्पर्शाने परशुराम टेकडी पावन झाली आहे त्याचबरोबर या ठिकाणाहून वाहणाऱ्या झऱ्यामुळे समुद्रकिनारी भागात गोड्या पाण्याचे चवदार तळे निर्माण झाले आहे त्यामुळे हे एक तीर्थ क्षेत्र म्हणून नावारूपाला येणे शक्य आहे. जागेत परशुराम नगरी म्हणून विकसित झाल्यास सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो त्यासाठी याठिकाणी स्मारक उभारण्याची गरज आहे. त्यासाठी हरमळ तिठ्या वरून थेट परशुराम टेकडी पर्यंत पक्का रस्ता तयार करण्याची गरज आहे. तसे सरकारला परशुराचा भव्य प्रकल्प निर्माण झाल्यास पेडणे तालुक्याच्या पर्यटनाला वाव मिळणे शक्य असल्याचे त्या म्हणाल्या मांद्रे मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर, खासदार श्रीपाद भाऊ नाईक यांच्याकडेही याबाबत आपण चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.तरी स्व. मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेण्राया डॉ. प्रमोद सावंत यांनी हा प्रस्ताव पुढे न्यावा असे ते शेवटी म्हणाले.