मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच देशाची प्रतिमा अप्रतिम. अखंड भारतासह गरीबांचे कल्याण करण्याचे ध्येय. साखळीत भाजपचा स्नेहमेळावा उत्साहात
डिचोली/प्रतिनिधी
भारत देश अखंड करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी विविध धाडसी निर्णय घेत अनेक विषय सोडविले. हे करीत असताना ते सामान्य लोकांना विसरले नाही. प्रत्येक गरीब व दुर्बल घटकांची काळजी त्यांनी विविध योजनांतून घेतली आहे. अंत्योदय तत्वावर काम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आम्ही प्रत्येकजण कटिबद्ध आहे. त्यासाठी या सर्व योजना प्रत्येक घटकांकडे पोहोचाव्या यासाठी आम्ही काम करायचे आहे. या सरकारतर्फे होणाऱया कामांची जागृती प्रत्येक कार्यकर्त्याने सदैव करायला हवी. आज राज्यात निवडणुकीचे वातावरण नाही, तरीही प्रत्येक नेता कार्यकर्ता काम करीत आहे. भाजप पक्ष हा सदैव लोकांच्या सेवेत तत्पर आहे. हाच यामागचा अर्थ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
केंद्रातील भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साखळी रवींद्र भवनात आयोजित स्नेह मेळाव्याला व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी सभापती राजेश पाटणेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, नगरसेवक आनंद काणेकर, यशवंत माडकर, दयानंद बोर्येकर, रश्मी देसाई, शुभदा सावईकर, साखळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, सुभाष मळीक, विठोबा घाडी, कालिदास गावस तसेच विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य, विविध मोर्चा?चे अध्यक्ष, पदाधिकारी व इतरांची उपस्थिती होती.
राज्यातील लोकांची भाजपलाच पसंती
गोव्यात भाजपच्या नवीन पर्वाची सुरूवात झाली असून गेल्या 50 वर्षांत न झालेला विकास गेल्या चार वर्षांत झालेला आहे. सर्व क्षेत्रात विकासाची गंगा राज्यात आलेली आहे. राज्यात अनेक पक्ष आले. विविध क्ल?प्त्या लढविल्या पण यशस्वी ठरले नाही. राज्यातील लोकांनी केवळ भाजपलाच पसंती दिली. स्वयंपूर्ण राज्यासाठी गोवा पुढे येत आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. नोकरीच्या बाबतीतही आम्ही कमी पडणार नाही. साखळीत साधनसुविधा निर्माण करून देण्याचे काम आम्ही पूर्ण केले आहे. कोणी राजकीय स्वार्थ साधत आमच्यावर टिका करीत असणार त्याकडे आपण लक्ष देत नाही. आम्ही आमच्या कामांवर प्रकाश ठेऊन आहे. असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यां?नी पुढे म्हटले.
हेट्ट्रिकची संधी दिल्याबद्दल साखळीवासीयांचे आभार !
सांखळीत दोनवेळा निवडून आलेला आमदार तिसऱया वेळा येत नाही असा इतिहास बरेचजण सांगत होते. त्यावर मात करून साखळीतील प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे निवडून आले. सांखळीत तिसऱया वेळा आमदार निवडून आणण्याचा विक्रम साखळीवासीयांनी केला आहे. त्यासाठी सांखळीवासीयांचे आभार व अभिनंदन. तसेच राज्यातही तिसऱया वेळा सरकार निवडून आणण्यासाठी गोवाभरातून लोकांनी भाजपलाच पसंती दिली, यासाठी गोवेकरांचे आभार व अभिनंदन यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
वास्तविक सांखळीत 2012 पेक्षा अधिक मते मिळणे आवश्यक होती. मात्र ती कमी पडल्याची खंत आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी साखळी मतदारसंघावर दुर्लक्ष केले नाही. मतदारसंघात आल्यानंतर ते सामान्य कार्यकर्ते म्हणूनच वावरत होते. त्यामुळे ते सर्वांसाठी आपले वाटतात. कोणतेही पद त्यांनी आपल्या माथ्यावर चढवून घेतले नाही. गोव्यातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली चालणारे सरकार हे चांगल्या पद्धतीने चालत आहे. स्व. मनोहर पर्रिकर यांच्या नंतर उत्कृष्टरित्या हे सरकार डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली चालत आहे. गोव्यातील प्रत्येक घरात भाजप कार्यकर्त्यांनी जाणे आवश्यक आहे. प्रत्येक योजनेची माहिती देत त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. गेली आठ वर्षे हे सरकार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या तत्वावर चालत आहे. म्हणूनच अनेक धाडसी निर्णय घेत या सरकारने देशाला संरक्षण देण्याचे काम केले आहे, असे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकारच्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा ठपका नाही
गोव्यात ज्या विचारांसाठी भाजपची निर्मिती झाली तो विचार लोकांनी उचलून धरला आणि भाजपला वर आणले. देशाला स्वातंत्र्यानंतर या देशावर एकाच पक्षाने राज्य केले आणि देशाची वाटचाल कुठे नेली ते आपण पाहिलेच आहे. त्याकडे आता न जाता जे देशासाठी चांगले आहे त्यावरच प्रकाश टाकल्यास बरा. सुसंस्कारित देशप्रेमी कार्यकर्ते असलेला पक्ष आज या देशात सत्तेवर असल्याने भ्रष्टाचाराला थारा नाही. देशाला रात्रंदिवस काम करणारे प्रधान मिळाले आहेत. गेली आठ वर्षे केंद्र सरकारातील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा ठपका नाही. देशाचा मान आज जगात वाढलेला आहे. या देशावर होणारी सर्व टिका बंद झालेली आहे. आज जगात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला घेतला जात आहे. यावरूनच भारताची जगात उंचावलेली प्रतिमा आम्हाला पहायला मिळत आहे. असे प्रतिपादन यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. माजी सभापती राजेश पाटणेकर, माजी आमदार दयानंद सोपटे यांनीही यावेळी विचार मांडले. या मेळाव्यात आग्नेलो डी. सिल्वा, स्वाती माईणकर, राजेंद्र फाळकर, सुलक्षणा सावंत यां?नीही आपले विचार मांडले. अनंत गावस, पांडुरंग सावंत, शांबा गावकर, रामचंद्र न्हावेलकर, नगरसेवक आनंद काणेकर, मधुकर परब, सुनील सिनारी, राजाराम परब, सुंदर नाईक या साखळी मतदारसंघातील जे÷ भाजप कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संतोष मळीक यांनी केले. स्वागत मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी केले, तर आभार कालिदास गावस यांनी मानले.