Eknath Shinde News : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात यावेळी वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो.यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने हि योजना लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असणार आहे.मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.
‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजनेत याचा आहे समावेश
एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये
अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये
आणि वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च शासनाकडून मिळमार आहे.