कुंभारजुवे /प्रतिनिधी
प्रत्येक माणसाने समाजाशी बांधीलकी जपली पाहिजे तसेच आपल्या पर्यावरणाचेही रक्षण आपण करायला हवे. पुढील पीढीसाठी पर्यावरणीय संसाधने जपून ठेवणे ही काळाची गरज आहे त्यामुळे आपण त्यांचा उपयोग काळजीपूर्वक केला पाहिजे. साहित्य आपल्याला जगायला शिकवते म्हणून पूस्तके वाचणे गरजेचे आहे. असे हिंदीच्या सुप्रसिध्द कथाकार सुधा अरोडा ’हिंदी सप्ताह’ च्या सांगता सोहळय़ात बोलतांना म्हणाल्या.
कु. तनया दाते व कु. मैथिली भगत या द्वितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थीनींनी सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरवात केली. कु. शुभांगी जयसवाल हीने नृत्य सादर करून सर्वांचे स्वागत केले. प्राचार्य प्रो. पूर्णकला सामंत यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व हिंदी विभागाध्यक्ष डॉ. आशा गहलोत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
दिनांक 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर पर्यंत हिंदी विभागा द्वारे विद्यार्थ्यांसाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात निबंध लेखन, कविता वाचन, भाषण, कथा लेखन, देशभक्ति गीत गायन, पत्रलेखन या स्पर्धांचा समावेश होता. निबंध लेखन स्पर्धेत प्रथम-तनया दाते, द्वितीय-पूजा वझे, तृतीय-शालीनी गोंड व उत्तेजनार्थ ा मनीशा मळीक, कविता वाचन स्पर्धेत प्रथम ा मोनीका शर्मा, द्वितीय – दक्षता वेलकासकर, तृतीय-दिव्येश नाईक व उत्तेजनार्थ – इशीता सावंत तर कथा लेखन स्पर्धेत प्रथम – मनीशा मळीक, द्वितीय इशीता सावंत, मीनाक्षी अल्गाकेरी, तृतीय – दक्षता वेलकासकर, भाषण स्पर्धेत प्रथम -नीशा कुमारी, द्वीतीय – स्रेजल गावकर, तृतीय – निधी यादव तर पत्र लेखन स्पर्धेत प्रथम – शायना शाह, द्वितीय – पूजा वझे, तृतीय – दीक्षा गावस, देशभक्ति गीत गायन स्पर्धेत प्रथम – प्रथम वर्ष कला, द्वितीय – द्वितीय वर्ष कला व तृतीय -पी. जी. डी.टी. हिंदी यांनी पारितोषिके प्राप्त केली. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या स्पर्धांसाठी डॉ. आशा गहलोत, डॉ. सपना पेळपकर, कु. दीपाली सुतार, सची नाईक, आशा नायक व प्रशांत वेळीप यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
’हिंदी सप्ताह’ च्या समापन सोहळय़ाचे सूत्रसंचालन कु. आशा नायक यांनी केले तर डॉ. सपना पेळपकर यांनी आभार प्रकट केले.