होळीच्या सुटीनंतर होणार खंडपीठाची स्थापना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्नाटकातील हिजाबशी संबंधित प्रकरणी त्वरित सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हिजाब परिधान करण्याची अनुमती नसल्याने अनेक विद्यार्थिनी 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या परीक्षेत सामील होऊ शकणार नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले होते. यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी होळीच्या सुटीनंतर सुनावणीसाठी खंडपीठाची स्थापना करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. होळीनिमित्त सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज 12 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.
कर्नाटकात हिजाब परिधान करणाऱ्या विद्यार्थिनींना परीक्षेत सामील होण्याची अनुमती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी खंडपीठाची स्थापना केली जाणार आहे. हे प्रकरण होळीनंतर सुनावणीसाठी सूचीबद्ध केले जाणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
होळीच्या सुटीनंतर हे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध केले जाणार असल्याचे सरन्यायाधीशांनी म्हटले. यावर याचिकाकर्त्याने 5 दिवसांनी परीक्षा होणार असल्याचे म्हणत मुस्लीम विद्यार्थिनींचे एक वर्षाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली. यावर न्यायालयाने खंडपीठ स्थापन करणार असल्याचे सांगितले असले तरीही तारीख निश्चित केलेली नाही.