माणूस जोपर्यंत स्वत:च्या घरातले सुरक्षित आणि आरामदायी जीवन सोडून बाहेर पडत नाही, तोपर्यंत त्याला खऱ्या जगाचा अनुभव येत नाही. आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टींचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर एकदा तरी घर सोडून माणसाने बाहेर राहून बघावे. पण या विचारामागे अनेक चांगले व वाईट पैलू आहेत. माणसाचा खरा परिचय हा अनुभवानेच येतो. मानव जातीची खास गोष्ट ही आहे की माणूस हा जितका अद्वितीय आहे तितकाच समानदेखील आहे. पण ही समानता इतक्मया सहजा सहजी समजत नाही. माणूस समजून घेण्याची इच्छा असेल, तरच त्याचे विविध पैलू समोर येतात.
ज्या क्षणी माणूस घराबाहेर आपल्या स्वप्नांच्या दिशेकडे पाऊल टाकतो, त्याक्षणी त्याच्या आतापर्यंत माहिती असलेल्या जगाच्या व्याख्येचा कायापालट होतो. माणूस अशा गोष्टी करू लागतो आणि अनुभवू लागतो ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. माणूस नवीन लोकांना भेटतो, स्वत:हून प्रत्येक गोष्ट करू लागतो आणि स्वत:च्या जीवनाची जबाबदारी घेऊ लागतो. शहराबाहेर किंवा देशाबाहेर गेल्यावर विविध संस्कृतीत वाढलेली माणसं भेटतात. माणसाला नवीन धर्म आणि संस्कृतीची ओळख होते. या सर्व गोष्टींचा अनुभव घेतल्यावर कळते की ईश्वराने दिलेल्या या विश्वामध्ये माणसाने स्वत:च्या बुद्धिमत्तेने काय सुंदर जग निर्माण केले आहे. जगात कित्येक प्रकारची माणसे आहेत जी पिढ्या न् पिढ्या त्यांची संस्कृती जपत आली आहेत. विविध भाषा बोलणारी, वेषभूषा करणारी आणि विविध अन्न खाणारे लोक आज एकाच पृथ्वीवर जगत आहेत हे चमत्कारापेक्षा कमी नाही. पण बऱ्याचदा, आपल्याला आपल्या संस्कृतीचा इतका अभिमान असतो की आपण इतर संस्कृतींना तुच्छतेने पाहतो.
या सर्व गोष्टींचे जर बारकाईने निरीक्षण केले तर मनुष्य या अनुभवांमधून अधिक मौल्यवान काहीतरी शिकतो आणि ते म्हणजे मानवी स्वभाव. लहानपणापासून सतत एक विचार मनात यायचा की काही लोक दहशतवाद का पसरवतात? माणूस एकमेकाला का दुखावतो? क्रूरता का पसरवतो? बहुतांश वेळा सामान्य माणसाच्या डोक्मयात घरगृहस्थी आणि परिवार सोडून दुसरे काही विचार डोक्मयात आणायला वेळ देखील नसतो. मग तरीही काही लोक आयुष्यात चुकीचे मार्ग का निवडतात? हेच नव्हे तर मीडियामध्ये दाखवल्याप्रमाणे, दारिद्र्या, गुन्हेगारी वृत्ती आणि अशिक्षित लोकांची संख्या ही भारतातच अधिक आहे असेही भासवून दिले जाते. पण ‘दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं!’ याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे आदर्श जीवनशैली आहे जी प्रत्येकाने अनुसरण केली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की ते जीवनाच्या काही पैलूंमध्ये संघर्ष करत नाहीत आणि याचा अर्थ इतर विकसनशील देशांपेक्षा ते निकृष्ट आहेत असा नक्कीच नाही.
जेव्हा कोणी व्यक्ती घरातून बाहेर पडते आणि जगभरच्या माणसांशी ओळख करून घेते, तेव्हा माणसाला जाणवते की मानवी स्वभाव हा दिसतो त्यापेक्षा खूपच गुंतागुंतीचा आहे. जेव्हा आपण वाईट रीतीने वागतो, तेव्हा आपल्या वर्तनाची
प्रतिक्रिया आपल्याला लगेच मिळते. परंतु बरेचदा, आपण हे समजण्यात अपयशी ठरतो की इतर प्रत्येक मनुष्य कमी-अधिक प्रमाणात आपल्यासारखाच असतो. आपल्या चुकीच्या वागणुकीचे समर्थन करत असताना आपण समोरच्या माणसाची बिनधास्तपणे निंदा करतो. आपले आणि त्या माणसाचे विचार जुळले नाहीत तर त्याला चुकीचे ठरवून आपण मोकळे होतो.
आजकाल, लोक इतर लोकांच्या भिन्न मतांबद्दल इतके असहिष्णु झाले आहेत की परिस्थितीचे विश्लेषण करण्याऐवजी, ते विचार न करता त्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकण्यास तयार होतात. जात, धर्म, संस्कृती आणि देशाच्या आधारावर माणसात फरक करता येतो. पण एक गोष्ट आहे जी आपल्याला एकत्र बांधते आणि ती म्हणजे मानवी स्वभाव! राहणीमान, खाण्यापिण्याच्या पद्धती, धर्म आणि सण जरी वेगळे असले तरी प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा पाया एकच असतो. प्रत्येकाला स्वत:साठी व आपल्या माणसांसाठी एक आरामदायी आणि आनंदी जीवन घडवायचे असते. माणूस कोणत्याही भाषेत बोलला तरी भावना सगळ्यांना सारख्याच अनुभवायला मिळतात. मानवी स्वभावाच्या सर्वात मोठ्या पैलूंपैकी एक म्हणजे, मानव त्यांच्या सामाजिक स्थिती आणि भौतिक संपत्तीच्या आधारावर एकमेकांचा न्याय करतात. असे करत असताना, आपण एका वंशातील प्रजाती म्हणून बांधलेल्या सर्वात मोठ्या सामान्य घटकाकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक विसंगतीमध्ये, आपला युक्तिवाद बरोबर आहे असे आपल्याला वाटते, तर समोरची व्यक्ती सदोष आहे. जेव्हा प्रत्यक्षात, एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे प्रत्येक परिस्थितीला दोन भिन्न दृष्टिकोन असतात. खरंतर दोनपण नाही, अनेक दृष्टिकोन असतात. कारण मानवी स्वभावाची खास गोष्ट हीच आहे की मानवी स्वभावाची कोणतीही ठरावीक व्याख्या नाही किंवा कोणतीही दोन टोके नाहीत. येथे लक्षात घेण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण सर्व एकमेकांशी जोडलेले आहोत आणि एकमेकांसोबत सुसंवादाने राहण्यासाठी आपल्याला इतर लोकांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहणे आवश्यक आहे. हा तर्क ज्या माणसाला जमेल, तोच माणूस जीवनातील प्रत्येक अनुभवाचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकेल.
जगातील विविध संस्कृतींची आपल्या मनात असलेली पारंपरिक प्रतिमा सोडून, त्याकडे मुक्त, मोकळ्या मनाने पाहिले तरच मानवी स्वभावातील साम्य आपल्याला लक्षात येईल आणि जेव्हा ते लक्षात येईल, की ‘आदर्श मानव’ असे काहीही नाही. आपण सर्वजण निसर्गाने निर्माण केलेले काही दोषपूर्ण प्राणी आहोत जे या जीवनात जगण्याचा, हयात असेपर्यंत सुरक्षित राहण्याचा आणि शक्मयतो आनंदी राहण्याचा फक्त प्रयत्न करत आहेत.
-श्राव्या माधव कुलकर्णी