उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे रुबी असीफ खान या मुस्लीम महिलेविरुद्ध तिने गणेशभक्ती केल्यामुळे फतवा काढण्यात आला आहे. रुबी असीफ खान या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्या आहेत. त्या दरवषी गणेशोत्सव साजरा करतात. मुस्लीम असूनही हिंदू मूर्तीची पूजा केल्याबद्दल अनेक मौलाना त्यांच्यावर संतप्त झाले आहेत. त्यांनी त्यांच्याविरोधात फतवा काढला आहे.
मात्र, रुबी असीफ खान या फतव्याला बधलेल्या नाहीत. ज्यांनी आपल्याविरोधात फतवा काढला आहे, ते जिहादी आणि उग्रवादी प्रवृत्तीचे धार्मिक नेते आहेत, त्यांना या देशाचे भले बघवत नाही, त्यांना या देशात हिंदू-मुस्लीम संघर्ष भडकवत ठेवण्यातच स्वारस्य आहे, गणेशभक्ती करण्यामध्ये काहीही चुकीचे नाही, गणेश ही देवता भारतात सर्वत्र पूजली जाते. भारतातले मुस्लीमही भारतीयच आहेत. त्यामुळे ज्या देवतेचा संपूर्ण भारतात सन्मान केला जातो, त्याच देवतेला मुस्लीम भजत असतील, तर त्यात राग येण्यासारखे काहीच नाही. तथापि, काही लोकांना आपलाच धर्म सर्वश्रे÷ वाटतो आणि ते इतर धर्मांचा दुःस्वास करतात. आपण अशा लोकांना भीक घालत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आपल्याविरोधात आतापर्यंत अनेक फतवे काढण्यात आले आहेत. मुस्लीम धर्मातून आपली हकालपट्टी करण्यासाठी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. तथापि, आपल्यावर कोणीही कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आपण आपल्या मार्गापासून आणि देशभक्तीपासून हटणार नाही, असा निर्धार त्या व्यक्त करतात.