वार्ताहर/ बेंगळूर
पाचवी, आठवी आणि नववी इयत्तेच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत 18 मार्च रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बोर्डस्तरीय मूल्यमापन परीक्षा घेण्याबाबत राज्य सरकारने जारी केलेली दोन परिपत्रके उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने रद्द करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाला आव्हान देत सरकारने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी 18 मार्च रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. या याचिकेवर विनाअनुदानित खासगी शैक्षणिक संस्थांच्या वकिलांनी मांडलेला युक्तिवाद ऐकून शुक्रवारी न्यायमूर्ती के. सोमशेखर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे.